Catagories

श्रीप्रभु आज्ञेत राहणे

श्रीप्रभु आज्ञेत राहणे

अक्कलकोटच्या राजास पुत्रप्राप्तीची इच्छा होती. शिवाय संस्थानाच्या बाबतीत काही भानगडीही होत्या. त्याचे निवारण व्हावे म्हणून कारभारी, कारकून वगैरे माणसे नेहमी प्रभुदरबारी येत. त्याप्रमाणे काही विश्वासू लोक एकदा प्रभुंकडे प्रार्थना करण्याकरिता आले होते. त्यांना, “मी बोलवीन तेव्हा या, म्हणजे प्रसाद देतो”, असे प्रभुंनी कळविले होते. त्याप्रमाणे प्रभुंकडून, “प्रसाद घेण्यास या”, असा निरोप आला. त्यावेळी हे गृहस्थ भोजनास बसले होते. बोलवण्यास येणाऱ्या इसमाने ते जेवावयास बसले आहेत, भोजन संपवून येतील, असा परत निरोप प्रभुंना कळवला. त्यावेळी प्रभु फक्त, “अरेरे, प्रसादाची वेळ त्याने गमावली”, असे बोलून स्वस्थ बसले. पुढे त्या गृहस्थाने प्रसाद मिळवण्याबद्दल पुष्कळ खटपट केली, पण प्रसाद मिळाला नाही. स्वतःच्या उल्हासाने प्रभुंनी हातांत घेतलेला प्रसाद मिळणे, हे भाग्याचे चिन्ह होते. पण तो योग त्या लोकांना लाभला नाही

read more
झोळीपूजा आणि अन्नपूजा

झोळीपूजा आणि अन्नपूजा

प्रभु समाधीच्या अन्नपूजेच्या ह्या प्रथेचा मागोवा घेतला असता, श्री मार्तंड माणिक प्रभुंच्या काळापासून अन्नपूजेची प्रथा सुरू झाल्याचे कळते. श्री माणिक प्रभुंचे शिष्य असलेले दुबळगुंडीचे रामण्णापंत यांना, श्रीप्रभु जयंतीच्या दरबाराची सांगता अन्नपूजेने करा, अशी आज्ञा श्री मार्तंड माणिक प्रभुंनी केली आणि तेथूनच ह्या अन्नपूजेची परंपरा सुरू झाली. त्यानंतरच्या श्रावणमासाच्या अनुष्ठानाची सांगता, श्रावण मासाच्या शेवटच्या दिवशी पुजारी वर्गाने अन्नपूजेने करावी, अशी ही आज्ञा श्री मार्तंड माणिक प्रभुंनी केली. श्रावण मासाच्या अनुष्ठान समाप्तीच्या अन्नपूजेनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच, भाद्रपद प्रतिपदेला श्रीप्रभु गादीच्या पीठाधीशांच्या

read more
श्रीदत्त जयंती महोत्सव निमंत्रण पत्रिका

श्रीदत्त जयंती महोत्सव निमंत्रण पत्रिका

श्रीदत्त जयंती महोत्सव निमंत्रण पत्रिका,श्रीदत्त जयंती महोत्सव निमंत्रण पत्रिका,श्रीदत्त जयंती महोत्सव निमंत्रण पत्रिका,श्रीदत्त जयंती महोत्सव निमंत्रण पत्रिका,श्रीदत्त जयंती महोत्सव निमंत्रण पत्रिका,श्रीदत्त जयंती महोत्सव निमंत्रण पत्रिका,श्रीदत्त जयंती महोत्सव निमंत्रण पत्रिका,श्रीदत्त जयंती महोत्सव निमंत्रण पत्रिका,श्रीदत्त जयंती महोत्सव निमंत्रण पत्रिका

read more
नेटवर्क मध्ये येणे

नेटवर्क मध्ये येणे

एकदा द माणिक पब्लिक स्कूल मधील मुलांचे श्रीजीं सोबत ‘संवाद’ या कार्यक्रमात प्रश्न-उत्तर session सुरू होते. ‘एकच परमात्मा सगळ्यांनमध्ये कसा असू शकतो’ या प्रश्नाचे उत्तर देतांना श्रीजींनी मुलांना समजेल असं मोबाईलचं उदाहरण दिलं की जरी सगळ्यांकडे device व sim वेगवेगळे असो पण नेटवर्क एकच आहे . ते दिसत नसले तरी फोन सुरू असणे हे त्याचे proof आहे. तसेच परमात्म्याचे आहे… भलेही अनेक रूपे असोत पण तत्व एकच आहे. आपल्या सगळ्यांमध्ये त्या एकच परमात्म्याचा अंश आहे

read more
जब तलक मैं था

जब तलक मैं था

एक वेळ अशी येते की, साधकाची शक्ती संपून जाते, बुद्धीचे सामर्थ्य तोटके ठरते. तळमळ मात्र वाढत जाते. साधक अगतिक होतो. त्याचा अहंकार गळून पडतो. साधकाचा ‘मी’ पूर्णपणे शरणागत होतो. मनाची विलक्षण गतीही इथे अवरुद्ध होते. बुद्धीवृत्तीही शांत होतात. श्रीजींनी याचे सुंदर वर्णन काव्यबद्ध केले आहे.

read more
श्रीप्रभुमनोहराख्यान

श्रीप्रभुमनोहराख्यान

श्रीमाणिकप्रभुंचा लहान भ्राता । नृसिंहतात्या नामे विख्याता । विठाबाई पत्नी पतीव्रता । तात्या महाराजांची ॥१॥ नाईक घराण्याची वंशवेल । नृसिंहतात्याच आता फुलवेल । दत्तप्रसाद लवकरच भेटेल । आशीर्वचन श्रीमाणिकप्रभुंचे ॥२॥ होते कालयुक्ति नाम सवंत्सर । श्रावण अमावास्या दिवस...

read more