सारखं का माणिकनगरला जाता?
असं आहे बघा आमच्या श्री माणिक प्रभूंचे माणिकनगर! आणि तुम्ही म्हणता काय मिळत सारखं माणिकनगरला जाऊन? आहो हे सर्व तुम्हाला नाही समजणार कारण तुम्ही तर या संसाराच्या मोह माया पासून सुटूच शकत नाही, मग जो पर्यंत प्रभूंच्या जवळ जाण्याची बुद्धीचं होणार नाही तो पर्यंत समजणार नाही की काय आहे हे – माणिक नगर!
ज्ञानसूर्य श्री मार्तंड माणिक प्रभु
अशी वदंता आहे की श्रीक्षेत्र काशीत चुकून कोणालाही धक्का लागावा आणि तो ph.d असावा, तात्पर्य – तेथे अनेक विद्वान आहेत.आमच्या माणिक नगरीत तर या उलट आहे. Ph.d. प्राप्त करायला माणसाला काही वर्षे घालवावी लागतात. माणिकनगरात तर, ” गाव का बच्चा बच्चा वेदांती” असतो. श्री माणिक प्रभूंपासून आजच्या श्रीजीं पर्यंत सर्वांनी आपल्या प्रवचनातून जनमानसावर असे संस्कार केले आहेत. बाळ जन्मतः च वेदांत श्रवण करतं. आनंदाचं बाळकडू घेऊनच मोठं होतं.
न मिळे अशी मौज पुन्हा
या दत्तजयंती चे आणखी एक लक्षवेधी वैशिष्ट्य म्हणजे चैतन्यराज प्रभुंचे माणिक प्रभु चरित्रावर विश्लेषक प्रवचन आणि त्यास पद्यमालातील पदांचे समर्पक विश्लेषण ची जोड देत श्रोत्यांना परम आनंदाची अनुभूती देत होती. चैतन्यराज यांचे संगीतमय प्रबोधन ऐकताना एक आठवण आली ती मुद्दाम येथे सांगू इच्छितो. मार्तंड प्रभु जेव्हा एखादे पद लिहून झाले की ते पद कोणाला तरी प्रथम ऐकवावे या हेतूने कोणाला तरी ऐकण्यासाठी बोलवावे तर तसा सेवक मिळत नसे असे वारंवार घडत असे त्या वेळी मार्तंड प्रभु म्हणत की काय हे लोक एकालाही यातला गोडवा कळत नाही सगळेच अगदी सारखेच आहेत असे म्हणत.
प्रभु दर्शन
श्रीजी महाराजांची भेट होणं हा तर आमच्यासाठी खूप मोठा आशिर्वाद आहे. Charismatic & Magnetic Personality हे शब्द dictionary मध्ये वाचले होते पण त्याचा प्रत्यक्ष अनुभव म्हणजे श्रीजी महाराज.
मला तर वाटतं कि किती नशिबवान आहेत माणिकनगर व तिथल्या जवळपास च्या गावांमध्ये राहणारे गावकरी, तिथल्या शाळेत आणि वेद पाठशाळेत शिकणारे विद्यार्थी आणि नेहमी त्यांच्या सहवासात असणाऱ्या सर्व व्यक्ती. कारण श्रीजी म्हणजे “ज्ञानसागर”. त्यांच्याकडून किती प्रकारचं ज्ञान घेऊ असं वाटतं आणि त्यासाठी हा एक जन्म तरी पुरेसा पडणार नाही हे नक्की. सकाळी पूजा व इतर सर्व धार्मिक विधी सुरू असताना सलग ४ , ५ तास उभे राहून देखील येणाऱ्या सर्व भक्तांना भेटून, त्यांची विचारपूस करून, क्षणभरही विश्रांती न घेता पुन्हा प्रफुल्लित होऊन संध्याकाळी पुन्हा तोच उत्साह आणि पुढच्या कार्यक्रमातील त्यांचा वावर बघून थक्क व्हायला झालं. त्यांना बघितलं कि मला त्यांच्याच कवितेच्या ओळी आठवतात.
स्वर्णमृग पर लुब्ध होकर
साधकाचे हवे-नको उणावले की मनाची चंचलता उणावते. बुद्धीची विवेकशक्ती सबळ होते. वृत्ती बाहेर न धावता अंतर्मुख होऊ शकतात आणि अशा अंतर्मुख वृत्तीलाच परमात्म्याच्या दर्शनाची योग्यता प्राप्त होते. परमपूज्य सद्गुरु दासगणू महाराज म्हणतात, ‘अंतर्मुख वृत्ती करी । जरी बघणे असेल हरी।’
चिदानंदरूप: शिवोहम शिवोहम
श्रीगुरुंनी त्याला आज त्याच्या शिवस्वरूपाची जाणीव करून दिली होती. पुरातन शिवमंदिरात जेथे लखलखीत ऊन पडले होते, तेथे क्षणात पाऊस येतो काय आणि आपल्या देहाला भिजवून जातो काय ह्याचे गूढ शिवाला उलगडले होते. शिवशंकराला जल अत्यंत प्रिय आहे आणि शिवाच्या देहरूपी पिंडीवर अस्तित्वाने आज पावसाची संततधार धरली होती. गुप्तकाशी स्थानामध्येही साठलेल्या पाण्यामुळे शिवाला जणू गंगास्नानच घडले होते. कृतज्ञ आणि कृतार्थ भावनेने ओघळलेले डोळ्यातील आनंदाश्रू पावसाच्या साचलेल्या पाण्यात मिळाले होते. जीवाला शिवाची ओळख झाली होती, शिवाला अंत:स्थ शिवाची ओळख झाली होती. श्रीगुरुंनी शिवाला त्याच्या स्वस्वरूपाची ओळख करून दिली होती. आनंदाच्या त्या भरात शिवा झरझर परतीच्या मार्गाला लागला होता आणि त्याचवेळी त्याच्या कानाला कुठेतरी दूरवरून भजनाचे सूर ऐकू होते,
Recent Comments