पहा यशोदे
आतां गोपीची अवस्था अशी झाली की आतां तक्रार तर केलीच आहे ना, मग सर्वच खोड्या सांगून टाकाव्या! यशोदेला ती सांगते, ‘जात असतां यमुनेच्या पाण्या, मागुनी येऊनी वस्त्रचि फेडी ।।’ यमुनेच्या पाण्याला जाणे, म्हणजे तिथे स्नान करून, वस्त्र स्वच्छ धुवून, पुन्हा घागरीत पाणी भरून घरी आणणे आणि हा रोजच्या रोज नित्याचा उपक्रम होता.
परिक्रमा चार धामांची
ओहोटीचे (पोर्णिमे नंतरचे ) दिवस असूनही जणूकाही समुद्रालाही प्रभू दर्शनाची ओढ लागून भरती आली होती. मित्रहो ! यात अतिशयोक्ती मुळीच नाही , श्रीजी पासून काही अंतरावर आधी निर्वेध पणे डुंबणारे आमच्या सारखे यावेळी 2-3 वेळा सरळ मागे ढकलल्या गेलो किंवा काहीजण चक्क आडवे पडलो ही वस्तुस्थिती आहे. जसें घुसळलेल्या ताकातून लोण्याचा गोळा अलगद काढावा तसे आरामात गेलो आणि सरळ परत आलो.
सकलमत संप्रदायाचे कुटुंबप्रमुख
यात्रेच्या शेवटच्या दिवशी श्रीजी उपम्याची डिश हातात घेऊन सकाळी सर्व भक्तांसमवेत भक्तनिवसाच्या प्रांगणात नाश्ता करत होते. त्यानंतर त्यांनी तासभर खुर्चीत बसून सर्व प्रभू भक्तांना आपल्या सोबत फोटो काढून दिले. ह्यातून त्यांची भक्तांमध्ये रमण्याची वृत्तीच दिसून येते. परतीच्या प्रवासामध्ये ही येताना सारखीच बारीक विचारपूस सुरूच राहिली. परतीच्या प्रवासात शेवटी गुलबर्गा उतरल्यावर त्यांचे ढोल ताशांच्या गजरात, हारतुरे घालून ग्रामवासीयनतर्फे जंगी स्वागत रेल्वे स्टेशनवरच झाले. गुलबर्ग्यापासून हुमनाबादपर्यंतचा प्रवास श्रीजींनी शटल ट्रेनने सेकंड क्लासमधूनच केला. पाहिजे असते तर त्यांनी गुलबर्ग्याहून त्यांच्या खाजगी गाडीने प्रवास करून केला असता पण त्यांनी ते कटाक्षाने टाळले. माणिक नगरला पोहोचल्यावर माणिक नगरवासीयांनी पुन्हा थाटामाटात स्वागत करून श्रीजींच्या संकल्प सिद्धीला मानाचा मुजरा केला. ह्या आणि अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी, त्यांची प्रभुभक्तांशी जुळलेल्या नात्यांची वीण घट्ट करतात. श्री माणिकप्रभु संस्थानाशी जोडल्या गेलेल्या भक्तांच्या अनेक पिढ्या त्याच आत्मियतेने, त्याच विश्वासाने आजही का टिकून आहेत, याचे उत्तर सांगायला कुण्या पंडिताची आवश्यकता नाही.
जगन्नाथ पुरी यात्रा वर्णन
विमान बरोबर ३.०५ वाजता सुटले. पोहचण्याचे टाईम ५.२५ होते. सर्व मजेत चालेले होते.४.५५ वाजता मुंबई येथे लँडिंग साठी खाली आले आणि झपकन पायलट ने विमान वर वर नेले. अनाऊस्मेंट झाली खराब हवामानामुळे अर्धा ते १ तास उशिरा उतरेल. सर्वजण एन्जॉय करत होतो.५.४० वाजता कॅप्टनने अनाऊस्मेंट केले अजून हवामान खराब असल्याने उतरण्यास परवानगी नाही. सर्व विमाने अहमदाबाद व हैदराबादला डायवर्ट केली आहेत. आपल्या कडे इंधन अर्धा तास पुरेल एवढेच आहे. माहितीनुसार वरील दोन्ही विमानतळ १ तासा पेक्ष्या जास्त अंतरा वर आहेत.
उठी उठी प्रभुराय
पंचभुतात्मक पात्र स्थूलाचे, सूक्ष्म अन्नमय त्याते
आम्ल, तिख्त, मधुरम निजभाव अर्पिन नैवेद्याते
ध्यानाग्निने तपवूनि वृत्ति उष्मोदक तुजला ते
मुखशुद्धिस्तव भाव विशुद्ध अखेर अद्वैताचा
आले मानसपूजा कराया, उठी उठी प्रभुराया
श्रीजगन्नाथाष्टकम्
कदाचित्कालिन्दी तटविपिनसंगीतकरवो मुदा गोपीनारी वदनकमलास्वादमधुपः । रमाशम्भुब्रह्मामरपतिगणेशार्चितपदो जगन्नाथः स्वामी नयनपथगामी भवतु मे ॥ १ ॥ भुजे सव्ये वेणुं शिरसि शिखिपिंछं कटितटे दुकूलं नेत्रान्ते सहचरकटाक्षं विदधते । सदा श्रीमद्वृन्दावनवसतिलीलापरिचयो...





Recent Comments