by Mahesh Dubey | Aug 25, 2026 | Uncategorized

प्रभूंना बाहेर शोधणारी माणसं आणि स्वतःच्या अंतरंगात प्रभूंना अनुभवणारी माणसं या दोघांमधला फरक तुम्ही कधी पाहिला आहे? कधी अनुभवला आहे का? पहिल्या प्रकारात जिथे मूर्ती, तिथेच प्रभु. परिणामी, जितका वेळ आपण मूर्तीसमोर असतो, तितकाच वेळ प्रभूंची अनुभूती टिकते. एकदा का मूर्ती नजरेआड झाली की—“मूर्ती हटी, दुर्घटना घटी!” मनात शेकडो अनुत्तरित प्रश्न असतात आणि ही माणसं कायम त्यातच भरकटत राहतात. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रभूंनी द्यावीत, आपल्या मनासारखं घडवावं आणि शक्य असेल तर आपलं प्रारब्ध बदलण्याचं कॉन्ट्रॅक्टही प्रभुनेच घ्यावं—अशी अपेक्षा असते!
ही मंडळी इतरांना माणिकप्रभू म्हणजे काय, ते किती दिव्य आहे वगैरे उत्तम सांगू शकतात. पण त्या सगळ्या भक्तीमुळे त्यांच्या स्वतःच्या आयुष्यातील सद्गुणांचं Capital Investment किती वाढलं आणि त्याचा प्रत्यक्ष फायदा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला झाला की नाही—हे मात्र विचारायचं नसतं! दुसऱ्या प्रकारात, स्वतःच्या अंतरंगात प्रभूंना शोधण्याची प्रक्रिया सुरू झालेली असते. त्यामुळे त्यांचे अनेक प्रश्न आपोआपच सुटू लागतात. कारण माणिकप्रभु त्यांच्यासोबत केवळ मंदिरात नाही, तर चोवीस तास त्यांच्या आचार-विचारांत असतात.सर्वांत आधी सुटणारा प्रश्न बहुधा राग, लोभ आणि मत्सराचा असतो. याच विकारांतून हेवेदावे, भाऊबंदकी, नात्यांमधील दुरावा आणि कुटुंबव्यवस्थेतील बिघाड निर्माण होतात. पुढे त्यातूनच सामाजिक अस्वास्थ्य वाढत जातं.
याउलट प्रेम, स्नेह, जिव्हाळा, करुणा आणि कृतज्ञता हे दैवी गुण दुसऱ्या प्रकारातील माणसांच्या जगण्याचाच भाग बनतात. प्रभूंचे गुण स्वतःमध्ये उतरवले की प्रभुही भरभरून देणारच ना! मग तिकडून “देते जावं देते जावं आणि इकडून “घेत जावं घेत जावं असं जगण्याच्या समृद्धीचं जबरदस्त कॉम्बिनेशन तयार होतं शेवटी आयुष्य म्हणजे तरी काय?
प्रभूने दिलेल्या या जीवनाचा भरभरून उपभोग घेणं, प्रत्येक अनुभवाबद्दल कृतज्ञ राहणं आणि आपलं जगणंच आनंदाचा सोहळा बनवणं. या पलीकडे आयुष्य म्हणजे आणखी काय असतं? तुम्ही एक पाऊल प्रभूंच्या जवळ आलात तर ते दहा पाऊल तुमच्या जवळ येतात आणि प्रभूंनी म्हटलेच आहे !!आम्हाला धरता येते पण सोडता येत नाही!
by Mahesh Dubey | Jan 2, 2023 | Uncategorized

भौतिक वस्तू प्राप्त होणे म्हणजे प्रभु कृपा नव्हे. भौतिक सुख-समृद्धी जवळ नसतानाही समाधानी आसणे, म्हणजे प्रभु कृपा.
श्री सदगुरू ज्ञानराज माणिक प्रभु महाराजांनी “प्रभु ने मेरा सब कूछ छिना” या पदातून सांगितलय की ज्यां भक्तांवर प्रभूंना कृपा करावयाची असते त्यांना प्रभु काही देत नाहीत तर त्यांच्याकडूनच सर्व काही काढून घेतात. प्रभु सर्वांसोबत असं करत नाहीत. ज्याला जे हवंय ते सर्वकाही किंबहुना त्याहून ही आधिकच देतात आणि त्यांना पूर्ण संतुष्ट करतात. परंतु कधी कधी जेव्हां एखाद्या भक्तावरती अत्यंत कृपा करावयाची असते तेव्हां प्रभु काही देत नाहीत, उलट त्या भक्ता कडून सर्वकाही काढून घेतात. सर्व काही काढून घेतल्यानंतर त्या भक्ता कडे काहीच उरत नाही. सुख आणि दुःख यांना काहीच महत्त्व राहत नाही. तेव्हां त्याच्या कडे करण्या साठी काही ही राहत नाही आणि आयुष्यात कसलीही इच्छा शिल्लक राहत नाही. फक्त एकच गोष्ट शिल्लक राहते ती म्हणजे ‘‘माणिक, माणिक जय गुरु माणिक‘‘ हे नाव घेत आयुष्य जगणे.
जीवनात जगत असताना असंख्य संकटे, विविध आडचणी सर्वांनाच येत असतात. अनेक दुःखद प्रसंगांना सामोरे जावं लागतं. त्या अडचणीच्या डोंगराला सामोरे जाण्याची, त्याच्याशी झुंजण्याची जी शक्ती आपल्याला मिळते, ती शक्ती म्हणजेच प्रभु कृपा. आयुष्यात येणारे अनेक संकटे आपल्याला नकळत टळून जातात हीच प्रभु कृपा. एकवेळचे जेवणाचे वांदे असताना ही दोन वेळचे जेवण मिळणे ही ही प्रभूचीच कृपा. ‘आता सर्व संपलं’ अस वाटत असताना पुन्हा उठून विश्व निर्माण करण्याची नवी उमेद उत्पन्न होते ती उमेद म्हणजेच प्रभू कृपा.
प्रभु चरित्रातील 23वा अध्याय जर आपण पहिला तर त्यात कोमटी जातीतील एक बालिका, लहान वयातच विधवा होते, आई, वडील भाऊ बहिण सर्व नातेवाईक, सखे सोयींरीचा साथ सुटून जातो. आधारासाठी तिला कोणीच राहत नाही,आशा आर्थहीन जीवनात जेव्हां प्रभूंची भेट होते आणि प्रभु कृपा होते तेव्हां त्याच स्त्रीला देवत्व प्राप्त होते. आज आपण त्यांना व्यकंमा देवी या नावाने पुजतो, हीच आहे प्रभु कृपा.
माणसाच्या जीवनात आनेक लहान मोठ्या घटना घडत असतात कुठल्या ना कुठल्या रूपात प्रभूंची कृपा अखंडित रूपी होतच असते, परंतु त्या माणसाला प्रभूंची झालेली कृपा कळण्या साठीही भाग्यच लागते आणि ते समजण्या साठी योग्य सदगुरू मिळण्याची गरज असते. त्याशिवाय प्रभूंची झालेली कृपा ही समजत नाही.
आपल्याला परमेश्वर आणि गुरु एकाच देहात भेटणे म्हणजे भाग्यच की हो. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो आणि पूर्वजन्मीच्या पुण्याईंचे फळ असतील की मला श्री सद्गुरू ज्ञानराज माणिक प्रभु महाराजांकडून आनुग्रह प्राप्त झाला. आणि मी जेव्हांही माझ्या सदगुरूंचे दर्शन घेतो तेव्हां हे जाणवते की माझे प्रभु आणि माझे गुरु दोघेही एकच देहात वास करत आहेत.
आशीच प्रभु कृपा सर्वांना मिळो हीच प्रभुचरणी प्रार्थना करतो.
by Mahesh Dubey | Dec 26, 2022 | Uncategorized
दर पौर्णिमेला माणिकनगरला जायचं म्हटल की ,काही जन म्हणतात काय वेड लागलंय का काय तुला दर महिन्याला पौर्णिमा आली की माणिक नगरला पळतोस! तर आमच्या भाषेत वेडच आहे ते आणि आम्ही प्रभूचेच वेडे आहोत. नाहीतर तुम्ही तिथं जालच कशाला? बरोबर ना? वेळ आल्यावर्ती वेडेच कामाला येतात बरं आणि शहाणे दुरूनच पळून जातात. वरून अस विचारतात की काय मिळतं तिथं सारखं सारखं जाऊन?
कामधंदे सोडून पळताय अस काय आहे माणिक नगरला ? तर मग आइका. अहो कामधंदे सोडून आम्ही जात नाही तर आम्ही आमच्या प्रभूंसाठी वेळात वेळ काढून जातो, त्यांच्या दर्शनासाठी जातो. मंदिराच्या नऊ पायऱ्या चढत असताना प्रत्येक पायरी चढल्या वरती चांगली आणि वाईट केलेली सर्व कर्म आठवतात आणि डोळे भरून येतात – ते आहे माणिकनगर! आयुष्यातील सगळी दुःख विसरून, घरची, बाहेरची कटकट विसरून दोन दिवस जे सुखाने जगतो ना, जिथं खऱ्या सुख आणि समाधानाचा आभास होतो तेच आहे – माणिकनगर! दर पौर्णिमेला श्री ज्ञानराज माणिक प्रभू महाराजांची आमृतवाणी त्यांच्या आगदी समोर बसून आईकण्याचे भाग्य मिळते, भक्तिमय वातावरणात राहून जो आनंद मिळतो ते ठिकाण म्हणजे – माणिकनगर! सर्व जाती धर्माची माणस, श्रीमंत असो वा गरीब जिथं एकत्र येतात, भंडारखाण्यात एकत्र महाप्रसाद घेतात ते पुण्य ठिकाण आहे – माणिकनगर! जिथं सर्व सुख दुःखाची, पाप आणि पुण्यांची बेरीज वजाबाकी करून सुद्धा शिल्लक काही राहत नसेल आणि तरी सुद्धा काहीतरी मिळणारच ते स्थान म्हणजे – माणिकनगर! मुलांचे शिक्षण, मुला, मुलींची लग्न, नोकरीत बढती, आरोग्याच्या तक्रारी, व्यवसायात वाढ हे सर्व मनासारखं जिथं होत ते ठिकाण म्हणजे – माणिकनगर! जिथे मोठ मोठे योगीपुरुष, नतमस्तक होतात, मोठ मोठी संतपुरुष वेगवेगळ्या रूपाने येऊन जातात. अहंकार जिथं गळून पडतो आणि मग अक्कल ठिकाण्यावरती येते, आपराध केल्याची जिथं जाणीव होते ते स्थान म्हणजे – माणिकनगर!
असं आहे बघा आमच्या श्री माणिक प्रभूंचे माणिकनगर! आणि तुम्ही म्हणता काय मिळत सारखं माणिकनगरला जाऊन? आहो हे सर्व तुम्हाला नाही समजणार कारण तुम्ही तर या संसाराच्या मोह माया पासून सुटूच शकत नाही, मग जो पर्यंत प्रभूंच्या जवळ जाण्याची बुद्धीचं होणार नाही तो पर्यंत समजणार नाही की काय आहे हे – माणिक नगर!
Recent Comments