यंदाची दत्तजयंती अनेक दृष्टीने वैभवसंपन्न ठरली. रंगीत इंद्रधनुष्य ठायी ठायी वैभव संपन्न होत होती. आनंद आणि ज्ञानाचा राजमार्ग क्षणोक्षणी श्री ज्ञानराज प्रभु शब्दांकित करत होते. देवळातून कृपा प्राप्त होते पण ज्ञान सजीव गुरूच देऊ शकतो असे ठाम प्रतिपादन करीत प्रत्येकाची बॅटरी चार्ज करण्याकरिता गुरुच आवश्यक असतो असा बोधक संदेश देत आध्यात्मिक मार्गदर्शन करत होते. आणि श्रवण, मनन निदिध्यस हा त्रिसूत्री फार्मूलाच मोक्षप्राप्ती करून देतो असे ठामपणे सांगीतले.

या दत्तजयंती चे आणखी एक लक्षवेधी वैशिष्ट्य म्हणजे चैतन्यराज प्रभुंचे माणिक प्रभु चरित्रावर विश्लेषक प्रवचन आणि त्यास पद्यमालातील पदांचे समर्पक विश्लेषण ची जोड देत श्रोत्यांना परम आनंदाची अनुभूती देत होती. चैतन्यराज यांचे संगीतमय प्रबोधन ऐकताना एक आठवण आली ती मुद्दाम येथे सांगू इच्छितो. मार्तंड प्रभु जेव्हा एखादे पद लिहून झाले की ते पद कोणाला तरी प्रथम ऐकवावे या हेतूने कोणाला तरी ऐकण्यासाठी बोलवावे तर तसा सेवक मिळत नसे असे वारंवार घडत असे त्या वेळी मार्तंड प्रभु म्हणत की काय हे लोक एकालाही यातला गोडवा कळत नाही सगळेच अगदी सारखेच आहेत असे म्हणत. पण आज चैतन्यराज, मार्तंड प्रभुंचे पदांचा संदर्भ देत प्रभु चरित्र सांगत आहेत हे पाहून मार्तंड प्रभुंच्या मनात आणि माणिक प्रभुंच्या मनात चैतन्यराजां विषयी काय भावना झाल्या असतील असं नुसतं मनात आलं तरी आपलं मन एक वेगळीच ऊर्जा निर्माण करते. चैतन्यराज प्रभुंचा प्रवचन ऐकून हेच मला जाणवलं. या सगळ्या बाबी विचारात घेऊन पदांचा संदर्भ समजून घेत प्रभु चरित्र श्रवण मनन आणि निदिध्यस द्वारे समजून घेतलं तर प्रत्येक पद आपणाशी बोलके होईल हाच संदेश चैतन्यराजांच्या प्रवचनाच्या माध्यमातून मिळाला.

देवलोकातील स्वर्गीय आनंदाची अनुभूती देणारी दत्त जयंती – असेच वर्णन यावेळी करावे लागेल.
बस इतकेच लिहून विराम घेतो की – न मिळे अशी मौज पुन्हा पाहण्या नरा!!

[social_warfare]