ईश्वराबद्दल भीती
त्याचवेळी, जर मानवाला भीती नसली तर आचरणात स्वच्छंदता किंवा उच्छृंखलता येऊ शकते असाही अपवाद येतो. ह्याचे समाधान करताना श्रीजी म्हणतात की, ह्या स्वच्छंदतेला, ह्या उच्छृंखलतेला काबूत ठेवून, मनाला नित्य साधनेच्या मार्गात आणून परमात्म्याप्रती एकदा का प्रेम झाले की मग भीतीचा लवलेशही उरत नाही. जसे एखाद्या लहान मुल आपल्या आईस घाबरत नाही कारण तेथे निर्व्याज्य प्रेम असते…
श्रीप्रभु की रचना का बोधप्रद विवेचन
हम अपनी सामान्य बुद्धि और लौकिक दृष्टि से जब प्रभु की वाणी को, उनके उपदेशों को उनकी रचनाओं को समझने का प्रयास करते हैं तो वास्तविक अर्थ से भटक जाते हैं और स्वकल्पित अवधारणाऍं बना लेते हैं। इसीलिए महाराजश्री ने कहा है ज्ञान मार्तांडा दिव्य दृष्टिने जाणा।। महापुरुषों की लीलाओं को तथा उनके कार्य को जानने और समझने के लिए दिव्य दृष्टि की आवश्यकता होती है। और मेरा मानना है, कि सौ उमा ताई को प्रभु की कृपा से वह दृष्टि प्राप्त हुई जिसके फलस्वरूप उन्होंने प्रभु महाराज द्वारा रचित इस दिव्य पद के भीतर छिपे अमृतमय रहस्य के दर्शन स्वयं किए और हमें भी करवाए। प्रभुस्वरूप के सतत अनुसंधान के फलस्वरूप लेखिका पर जो कृपा हुई है वह यहॉं इस लेख में दृग्गोचर है। मैंने जब इस लेख को पढ़ा और लेखिका द्वारा प्रतिपादित अर्थ को समझा तो मुझे ऐसा लगा जैसे सालों से छिपा हुआ कोई खज़ाना मिल गया हो। बुद्धि की खिड़कियों को खोलने वाला यह सुंदर एवं उदात्त विवेचन मन को आह्लादित करने वाला है। सभी प्रभुभक्तों से मेरा अनुरोध है, कि इस लेख को अवश्य पढ़ें और श्रीप्रभु के इस पद में छिपे अर्थ का अनुसंधान करें। हमारा संप्रदाय ज्ञानयुक्त भक्ति का मार्गदर्शन करता है। सांप्रदायिक रचनाओं को गाना, पढ़ना और उनके अर्थ का अनुसंधान करना यह प्रत्येक प्रभुभक्त का परम कर्तव्य है और यही सर्वोच्च उपासना भी है। हमारे प्रभु महाराज ने इतने प्रेम और
कृष्णा मजकडे पाहू नको…
राधा भक्त आहे. श्री नारदांनी भक्तीची व्याख्याच मुळी ‘सा तु अस्मिन् परम प्रेमरूपा’ अशीच केलीय. म्हणूनच श्री प्रभूंनी राधेला ‘प्रीतीची राधा’ म्हणून संबोधिले आहे. ‘कृष्ण कृष्ण कृष्ण’ ही तिची एक वृत्ती झाली आहे. तेव्हां अशामधे राधा कृष्णच बनली तर? विभक्त नव्हे तो भक्त बनली तर? माऊलीने एके ठिकाणी सांगितले आहे की त्या कोशातल्या किड्याला बाहेरून भुंगा टोचा मारीत असतो, त्याच्या भीतीने त्या किड्याला सारखा त्याचाच ध्यास लागलेला असतो. त्यामुळे एक दिवस तो किडाही त्या भूंग्यासारखाच होऊन बाहेर पडतो हीच भीती राधेला आहे जणू । म्हणूनच ती अति सावधतेने हरिचरणाजवळ जातेय न जाणो त्याच्या ध्यासानें मी कृष्णच झाले तर। मग त्या द्वैताचा आनंद भोगायचा कुणी? जसं संत तुकोबा म्हणतात, ‘जळो माझी ऐशी बुद्धी। जी घाली मज तुजमधी॥ ऐसे करी विठुबाई।, तुझे पाय, माझे डोई॥ बस्, यांतच आनंद आहे.
शरणागती
श्रावण पोर्णिमा निमित्त शरणागती विषयी माणिक प्रभु संप्रदायातील सगळया पिठाधिपतीनी समृद्ध केलेल्या पद्यमालेतील विविध भाषेतील रचनांचा तसेच देव देवतांचा संदर्भ देत शरणागती विषयी फार चित्तवेधक विवेचन केले ते ऐकून आजचे सर्व सामान्य भक्तांचे जीवन डोळयासमोर आले आणि त्या अनुषंगाने एक सामान्य जनतेचा विचार येथे प्रकट करण्याचे धाडस करतो. अध्यात्मिक परंपरेतील भक्त आसक्ति आणि दैनंदिन जीवना विषयी विन्मुखता या चक्रव्यूहात सापडलेला असताना भयाने नियतीने दिलेल्या स्थितिस अनुसरून नियत कर्मापासून परामुख होवून आणि असहाय होवून शरणागती स्विकारतो अशीच भावना प्रकट होते आणि वैराग्य चे आवेशात दुबळी माणसे जिवन विन्मुख होतात ही बाब खरोखर विचार करण्या सारखी आहे त्या पेक्षा तुझ्या आजच्या जीवनात जी भूमिका आहे आणि तिला अनुसरून तुझी जी भूमिका आहे तिला न्याय देत प्रभुचे जे निर्गुण रूप आहे त्या शक्तीशी सायुज्य पावणयासाठी तळमळ आणि उत्कटता कायम ठेव कारण आपली नियत कर्मे आणि जबाबदारी पार पडल्या नंतर हीच तळमळ आपले भांडवल राहणार आहे हाच मतितार्थ प.पु. ज्ञानराज माणिक प्रभु महाराजांच्या प्रवचनातून मिळाला अशी माझी भावना झाली.
योगक्षेमं वहाम्यहम्
एक छोटीशी झांजच ती! तिचे एवढे काय कौतुक??कौतुक एवढ्यासाठी की शंभर वर्षाहून अधिक काळ ही झांज आमच्या कुटुंबात असावी. कारण ही झांज आमच्या पणजोबांच्या बालपणापासून तरी नक्कीच आमच्याकडे आहे असे माझे आजोबा सांगायचे आणि पणजोबांचा जन्म १९०० सालचा होता. दुसरे असे की असा नाद व आवाजाचा गोडवा असलेली झांज आजपर्यंत शोधुनही कुठे मिळाली नाही. गणेशोत्सवात व नवरात्रोत्सवात बऱ्याच ठिकाणी आम्ही ही उपयोगात आणतो. ज्या आप्तांकडे आरती अथवा भजनाला आम्ही जातो त्यांचा आग्रहच असतो की येताना ही झांज आठवणीने घेऊन यावी.
गुरुदक्षिणा
पण खरंच सद्गुरुला काहीच अपेक्षा नसते का शिष्याकडून? असते न, एवढीच अपेक्षा असते की त्यांनी सांगितलेल्या मार्गाचा शिष्याने अवलंब करावा, त्यांची शिकवण मनात खूप खोलवर रुजवून, त्यांच्या तत्त्वांना शिष्याने आपले जीवन-सिद्धांत बनवावे.. आणि ही अपेक्षा सुद्धा कशाकरिता, तर शिष्याच्याच आध्यात्मिक उत्कर्षाकरिता! कारण असे केल्याशिवाय हा भवसागर पार करून जाणे अशक्य आहे. प्रभुंनी दुसऱ्या एका पदात समजावलेच आहे-
Recent Comments