सकलमत संप्रदायाचे कुटुंबप्रमुख
यात्रेच्या शेवटच्या दिवशी श्रीजी उपम्याची डिश हातात घेऊन सकाळी सर्व भक्तांसमवेत भक्तनिवसाच्या प्रांगणात नाश्ता करत होते. त्यानंतर त्यांनी तासभर खुर्चीत बसून सर्व प्रभू भक्तांना आपल्या सोबत फोटो काढून दिले. ह्यातून त्यांची भक्तांमध्ये रमण्याची वृत्तीच दिसून येते. परतीच्या प्रवासामध्ये ही येताना सारखीच बारीक विचारपूस सुरूच राहिली. परतीच्या प्रवासात शेवटी गुलबर्गा उतरल्यावर त्यांचे ढोल ताशांच्या गजरात, हारतुरे घालून ग्रामवासीयनतर्फे जंगी स्वागत रेल्वे स्टेशनवरच झाले. गुलबर्ग्यापासून हुमनाबादपर्यंतचा प्रवास श्रीजींनी शटल ट्रेनने सेकंड क्लासमधूनच केला. पाहिजे असते तर त्यांनी गुलबर्ग्याहून त्यांच्या खाजगी गाडीने प्रवास करून केला असता पण त्यांनी ते कटाक्षाने टाळले. माणिक नगरला पोहोचल्यावर माणिक नगरवासीयांनी पुन्हा थाटामाटात स्वागत करून श्रीजींच्या संकल्प सिद्धीला मानाचा मुजरा केला. ह्या आणि अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी, त्यांची प्रभुभक्तांशी जुळलेल्या नात्यांची वीण घट्ट करतात. श्री माणिकप्रभु संस्थानाशी जोडल्या गेलेल्या भक्तांच्या अनेक पिढ्या त्याच आत्मियतेने, त्याच विश्वासाने आजही का टिकून आहेत, याचे उत्तर सांगायला कुण्या पंडिताची आवश्यकता नाही.
जगन्नाथ पुरी यात्रा वर्णन
विमान बरोबर ३.०५ वाजता सुटले. पोहचण्याचे टाईम ५.२५ होते. सर्व मजेत चालेले होते.४.५५ वाजता मुंबई येथे लँडिंग साठी खाली आले आणि झपकन पायलट ने विमान वर वर नेले. अनाऊस्मेंट झाली खराब हवामानामुळे अर्धा ते १ तास उशिरा उतरेल. सर्वजण एन्जॉय करत होतो.५.४० वाजता कॅप्टनने अनाऊस्मेंट केले अजून हवामान खराब असल्याने उतरण्यास परवानगी नाही. सर्व विमाने अहमदाबाद व हैदराबादला डायवर्ट केली आहेत. आपल्या कडे इंधन अर्धा तास पुरेल एवढेच आहे. माहितीनुसार वरील दोन्ही विमानतळ १ तासा पेक्ष्या जास्त अंतरा वर आहेत.
उठी उठी प्रभुराय
पंचभुतात्मक पात्र स्थूलाचे, सूक्ष्म अन्नमय त्याते
आम्ल, तिख्त, मधुरम निजभाव अर्पिन नैवेद्याते
ध्यानाग्निने तपवूनि वृत्ति उष्मोदक तुजला ते
मुखशुद्धिस्तव भाव विशुद्ध अखेर अद्वैताचा
आले मानसपूजा कराया, उठी उठी प्रभुराया
श्रीजगन्नाथाष्टकम्
कदाचित्कालिन्दी तटविपिनसंगीतकरवो मुदा गोपीनारी वदनकमलास्वादमधुपः । रमाशम्भुब्रह्मामरपतिगणेशार्चितपदो जगन्नाथः स्वामी नयनपथगामी भवतु मे ॥ १ ॥ भुजे सव्ये वेणुं शिरसि शिखिपिंछं कटितटे दुकूलं नेत्रान्ते सहचरकटाक्षं विदधते । सदा श्रीमद्वृन्दावनवसतिलीलापरिचयो...
अद्भुत चरित्र परिक्रमा
श्री. परागजींच्या उत्कटतेने प्रत्येक चित्र आपल्याला श्रीप्रभुच्या चैतन्याची अनुभूती करवून देणारे, अतिशय सजीव वाटणारे असे झाले आहे. ह्या चित्रांना केलेली चौकटही अतिशय भव्य आणि चित्ताकर्षक आहे. प्रभु जात्याच सुंदर आणि प्रभुची प्रत्येक कलाकृतीही सुंदर… ही उक्ती येथेही लागू होते. श्री प्रभुसंस्थानाने श्रीप्रभुंच्या समग्र जीवनपटाचा हा अमुल्य, चिरंतन ठेवा समस्त प्रभुभक्तांसाठी उपलब्ध करुन दिल्याबद्दल श्री प्रभुसंस्थानाचे अभिनंदन, कौतुक आणि आभार… ज्यांच्या संकल्पनेतून ही सचित्र परिक्रमा साकारली, त्या श्रीजींप्रती कृतज्ञता आणि त्यांच्या परममंगल चरणी कोटी कोटी वंदन… आणि श्रीजींच्या मनातील ही संकल्पना ज्यांनी प्रत्यक्षात उतरविण्यासाठी ज्यांनी श्रम केले, त्या सर्वांना अभिनंदन. ज्यांनी श्री माणिकचरितामृताचे वाचन केले आहे, त्यांना ह्या सचित्र परिक्रमेत विशेष आनंदाची अनुभूती येईल. ह्या सचित्र परिक्रमेत मला आत्यंतिक सुखाची अनुभूती आली आणि
The Glory of Maniknagar
चतुर्थ दत्तावतारी श्री माणिकप्रभुंनी आपल्या अवतारकाळात सन १८४५च्या सुमारास माणिक नगरची स्थापना केली. श्री माणिकप्रभु स्वतः शिवस्वरूप होते, हे श्री माणिक चरित्रामृतातील अनेक कथांतून आपल्याला अनुभवता येते. या गीताच्या धृपदातही ह्या पृथ्वीवर कैलास पर्वताची जर कोणती प्रतिकृती असेल, तर ती म्हणजे माणिकनगर… येथे श्री माणिकप्रभू चराचरांमध्ये व्यापून उरले आहेत आणि ते कसे ह्याची एक समग्र यात्राच ह्या गीतातून आपल्याला अनुभवता येते. ह्या गीतामध्ये सुरुवातीला दिसणारा प्रभू मंदिराचा कळस हा आपल्याला कैलास पर्वताच्या उत्तुंगतेची आणि त्या पाठोपाठ येणाऱ्या श्री मा
Recent Comments