संतांचं स्वभाव इतकं उदार आणि दयाळू असतं, की समोर आलेल्याला ते कधीच रिकामा पठवत नसतात. त्यांच्या कडून आपल्याला काही न काही अवश्य मिळतं. मग तो भक्त असो, शिष्य असो, याचक असो, विद्यार्थी असो किंवा जिज्ञासू असो. श्री सद्गुरु ज्ञानराज माणिकप्रभू महाराजांच्या समोर अनेकांना ही प्रचीती आली आहे. समोरच्या व्यक्तीची योग्यता आणि गरज़ेला पाहूण यथायोग्यरीत्या त्याचा समाधान व्हावा असं काही तरी त्याला देण्याचा महाराजांचा कटाक्ष असतो. आज आपण बघतो की कित्येक लोक महाराजांजवळ येतात आणि त्यांचे अमूल्य मार्गदर्शन मिळवून आपल्या जीवनाला सार्थक करण्यासाठी प्रेरित होतात. शेवटी, सद्गुरूंचे मुख्य कार्य हेच होय. गेल्या १५० वर्षांची परंपरा या संप्रदायाला लाभलेली आहे. या परंपरेचे सर्व आचार्यांनी आपपल्या विशिष्ट पद्धतीने ज्ञानदानाचे कार्य अत्यंत समर्थपणे केलेले आहे, हे सर्व विदित आहे परंतू श्रीमद्भगवद्गीतेचा आधार घेत प्रवचनाच्या माध्यमातून आम्हा सर्वांना या भवसागरातून तारण्याचे श्रेय श्री ज्ञानराज प्रभूंनाच आहे. ‘ज्ञानगंगेत’ भिजून संतृप्त होण्याचा भाग्य आमच्या सारख्या सामान्य माणसाला मिळत आहे, हे आपल्या पूर्व सुकृताचेच फळ होय. विराट रुपाच्या दर्शनाने अर्जुनाला जसा बोध झाला तसेच महाराजांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळवून कायेने, वाणीने आणि मनाने आम्ही सुद्धा सन्मार्गाकडे प्रवृत्त होवोत, श्री ज्ञानराज प्रभूंच्या चरणी हीच प्रार्थना.

[social_warfare]