संतांचं स्वभाव इतकं उदार आणि दयाळू असतं, की समोर आलेल्याला ते कधीच रिकामा पठवत नसतात. त्यांच्या कडून आपल्याला काही न काही अवश्य मिळतं. मग तो भक्त असो, शिष्य असो, याचक असो, विद्यार्थी असो किंवा जिज्ञासू असो. श्री सद्गुरु ज्ञानराज माणिकप्रभू महाराजांच्या समोर अनेकांना ही प्रचीती आली आहे. समोरच्या व्यक्तीची योग्यता आणि गरज़ेला पाहूण यथायोग्यरीत्या त्याचा समाधान व्हावा असं काही तरी त्याला देण्याचा महाराजांचा कटाक्ष असतो. आज आपण बघतो की कित्येक लोक महाराजांजवळ येतात आणि त्यांचे अमूल्य मार्गदर्शन मिळवून आपल्या जीवनाला सार्थक करण्यासाठी प्रेरित होतात. शेवटी, सद्गुरूंचे मुख्य कार्य हेच होय. गेल्या १५० वर्षांची परंपरा या संप्रदायाला लाभलेली आहे. या परंपरेचे सर्व आचार्यांनी आपपल्या विशिष्ट पद्धतीने ज्ञानदानाचे कार्य अत्यंत समर्थपणे केलेले आहे, हे सर्व विदित आहे परंतू श्रीमद्भगवद्गीतेचा आधार घेत प्रवचनाच्या माध्यमातून आम्हा सर्वांना या भवसागरातून तारण्याचे श्रेय श्री ज्ञानराज प्रभूंनाच आहे. ‘ज्ञानगंगेत’ भिजून संतृप्त होण्याचा भाग्य आमच्या सारख्या सामान्य माणसाला मिळत आहे, हे आपल्या पूर्व सुकृताचेच फळ होय. विराट रुपाच्या दर्शनाने अर्जुनाला जसा बोध झाला तसेच महाराजांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळवून कायेने, वाणीने आणि मनाने आम्ही सुद्धा सन्मार्गाकडे प्रवृत्त होवोत, श्री ज्ञानराज प्रभूंच्या चरणी हीच प्रार्थना.
[social_warfare]ज्ञानराज प्रभूंची ज्ञानगंगा
by Prabhu Agraharkar | Jan 2, 2022 | Marathi | 14 comments
SRI SADGURU DAYNARAJ Manik PRABHU MAHARAJA KI JAI
jai guru manik
जय गुरू माणिक, यथार्थ वर्णन, ज्ञानराज प्रभुमहाराजांचरणी वारंवार नमन…🌹🙏🌹
Jai Guru Manik Prabhuji
జై గురు మాణిక్ జై గురు మాణిక్
Shri Gyanraj ಪ್ರಭು ಮಹಾರಾಜ್ ಗೆ ಜಯ್
🙏” जय गुरू माणिक ” 🙏
Jai guru manik🙏
अगदी बरोबर. अनेकानेक प्रश्नांची उत्तरं श्रीजी न विचारताच देतात. अधिक महिन्यातल्या श्रीमद्भगवद्गीता ज्ञानयज्ञाच्यावेळी तर ही प्रचिती नेहेमीच येत होती. सुरुवातीचे काही दिवस प्रश्न पाठवले पण नंतर मात्र त्याची काहीच गरज उरली नाही. काही शंका मनात आल्या की एक दोन दिवसातच त्यांचे समाधान प्रवचनातून होत असे.
प्रथमदर्शनाच्या वेळीच वेदांतासंबंधी काही शंका महाराजांना विचारल्या. त्यांचे योग्य ते समाधान त्यांनी केलेच पण त्याचबरोबर “देवपूजा हे नित्यकर्म आहे; ते नित्यनेमाने केलेच पाहिजे” असे विचारले नसतानाही संपूर्ण संभाषणात दोन वेळा ठासून सांगितले.
देवपूजा, भजन वगैरे गोष्टींना “अतिसामान्य लोकांनी” करण्यायोग्य उपचार मानणाऱ्या माझ्यासाख्या पढतमूर्ख अर्धकच्च्या वेदांतवाद्याला कोणती मात्रा आवश्यक आहे हे श्रीजींनी बरोबर ओळखले. तेव्हा आपण ऐऱ्या-गैऱ्या वैदूपुढे नाही तर भवरोगवैद्यापुढे बसले आहोत ह्याची खात्री पटली.
खरोखर प. पू. ज्ञानराज माणिक प्रभु महाराज आपल्या सारख्यांच्या सामान्य बुद्धीला समजेल अशा सोप्या शब्दात नेहमीच समजाऊन देतात.
JAI guru manik
Satya ahe … Jai Guru Manik
जय गुरु माणिक🙏अगदी यथार्थ आहै .या गोष्टी ची मला क्षणोक्षणी प्रचीती आली आहै
hoo mana jai ho guru manik ganaraj maharaj