by Ragini Prabhu | Dec 10, 2022 | Uncategorized

माणिकनगर – श्रीप्रभु महाराजांच्या पदस्पर्शाने पावन, रमणीय, शांत अशी पुण्यभूमी.
आम्ही जेव्हा जेव्हा श्री दत्त महाराजांचे अवतार कार्य वाचायचो तेव्हा तेव्हा कुतूहल असायचं ते म्हणजे माणिकनगर कधी बघायला मिळेल याचंच !
श्री चैतन्यराज प्रभु रचित एक भजन आम्हाला ऐकायला मिळालं ते असं.
“इस भूमी पर कैलास का प्रतिरूप कोई है अगर
सर्वत्र माणिक है भरा वह धाम है माणिकनगर ”
आणि खरं सांगायचं तर तेव्हापासून वेधच लागले माणिकनगर ला जाण्याचे.
झालं असं कि you tube वरील “माणिक प्रभु” हे channel अचानक पणे आमच्या समोर आलं आणि तेही कोरोना काळात जेव्हा कडक लॉकडाऊन होतं तेव्हा.
सर्वात प्रथम you tube suggestions मध्ये आलं ते श्रीजी महाराजांचं “चमत्कार” या विषयावरील प्रवचन.
ते प्रवचन अश्या प्रकारे अचानक समोर येणं हाच एक “मोठा चमत्कार” होता.
त्यानंतर पहिलं भजन ऐकलं.
“देई मला इतुके रघुराया”
आणि त्यानंतर वेडच लागलं भजन ऐकायचं.
आमची सकाळ व्हायची या भजनाने आणि रात्र व्हायची “रामाचिया दुता, अंजनीच्या सुता” या भजनाने.
हळूहळू आमची जवळपास सगळी भजन ऐकून ऐकून पाठ झाली. तसेच सर्व वारांच्या आरत्या म्हणणं आम्हाला आवडायला लागलं. Channel पाहता पाहता पुढे समोर आलं श्रीजी महाराजांचं भगवदगीते वरचं प्रवचन.
लॉकडाऊनमूळे घरा बाहेर पडता येत नव्हतं आणि ती भयाण शांतता जेव्हा जेव्हा नको वाटायची तेव्हा तेव्हा स्वतः श्री माणिकप्रभु महाराज श्रीजींच्या रूपात आमच्या सोबत आहेत असं आम्हाला वाटायचं. हसत खेळत वेदांत शिकवण्याची श्रीजीं ची पद्धत आम्हाला खुप भावली आणि आम्ही दिवसदिवसभर भजनं , मग प्रवचनं त्यानंतर आरती असं ऐकायला लागलो.
“सर्वत्र माणिक है भरा वह धाम है माणिकनगर”
हि ओळ तर कानात सतत ऐकू येत राहायची आणि मग लगेच आठवायच्या त्या पुढच्या या दोन ओळी.
“वैकुंठ से भी श्रेष्ठ यह आनंदमय मंगल भुवन ,
केवल पहुचते है यहाँ सौभाग्यशाली भक्तजन ”
आणि मग मनात यायचं कि प्रभु महाराज आमच्या मनात काय सुरु आहे ते खरंच ऐकत असतील का? इतक्या लाखो करोडो भक्तांमध्ये त्यांना आम्ही मारलेली हाक ऐकू येत असेल का? तिथे पोहोचणाऱ्या सौभाग्याशाली भक्तजनांपैकी आपणहि एक असू का?
आणि या प्रश्नांची उत्तरं स्वतः श्रीप्रभु महाराजांनी आम्हाला दिली ३ डिसेंबर २०२२ रोजी त्यांच्या पुण्यतिथी च्या पवित्र दिवशी.
तो दिवस म्हणजे श्रीप्रभु महाराजांची पुण्यतिथी, गीता जयंती, आणि श्रीजी महाराजांचा जन्मदिवस. दुग्धशर्करा योग किंवा पर्वणी या शब्दाचा खरा अर्थ तेव्हा कळाला. अत्यंत अनपेक्षितपणे कोणत्याच प्रकारची पूर्व तयारी नसताना अगदीच अचानक प्रभु महाराजांच्या दरबारी येण्याचा योग स्वतः प्रभू महाराजांनीच घडवून आणला. त्यांच्या लीला तेच जाणतात हेच खरं. दोन, तीन वर्षांपासून असणारी प्रखर इच्छा पूर्ण झाली. माणिकनगरला कसं पोहचायचं हे सांगण्यासाठी आम्हाला मदत झाली ती “माणिक दर्शन ” App ची. या App वर अत्यंत सुंदर माहिती मिळते.
सकाळीं हुमणाबाद ला उतरल्या बरोबर मागून हॉर्न वाजवत पुढ्यात एक रिक्षावाले दादा हजर . ते पाहताच आपण प्रभु नगरीत प्रवेश केला असल्याची जाणीव झाली.जणू श्रीप्रभु महाराजांनी आम्हाला आणायलाच पाठवून दिलं होतं त्या रिक्षावाल्या दादांना.
“माणिकनगर” च्या पवित्र भूमीचा स्पर्श आणि तिथल्या कणाकणात जाणवत असणारं प्रभू महाराजांचं अस्तित्व हे केवळ अवर्णनीय आहे.
“माणिक विहार” जिथे भक्तांच्या राहण्याची सोय केली जाते तिथे प्रवेश करताच तिथली स्वच्छ्ता व टापटीपपणा पाहून मन अत्यंत प्रसन्न झालं. सुखद आणि चैतन्यमय असा परिसर. तिथली व्यवस्था, तिथल्या रूम्स आणि एकंदरीत व्यवस्थापन किती बारीक लक्ष देऊन सांभाळलं जातं याची कल्पना आली.तिथून पाच ते सात मिनिटांवर प्रभु महाराज समाधी मंदिर आहे.
प्रभु महाराजांच्या दर्शनाची ओढ लागल्यामुळे आम्ही धावत समाधी मंदिरात आलो आणि दिव्य समाधीचे दर्शन घेऊन डोळ्यांचं पारणं फिटलं. अष्टभाव जागृत होणं म्हणजे काय ते दरबारात उभे राहिल्यावर जाणवलं. आम्ही दोन – तीन वेळा समाधी दर्शन घेतलं पण मन काही भरत नव्हतं.
स्वतः श्रीप्रभु महाराज समोर बसून अतिशय गोड हसत आहेत असंच भासत होतं. गीता जयंतीच्या दिवशी साक्षात श्री कृष्ण भेटल्याचा आनंद आम्हाला झाला होता. डोळे दिपवणारी पूजा , अतिशय गोड आवाजात , सुरेल म्हणली जाणारी आरती आणि भजनं ऐकून कान तृप्त झाले.
श्रीजी महाराजांच्या प्रवचनात ते नेहमी सर्व श्रोत्यांना हसवण्यासाठी गंमत म्हणून ज्या भंडारखान्याचा उल्लेख करतात तिथे मिळणारा “भोजन प्रसाद” तर खाऊन पोट भरेल पण मन काही भरणार नाही असा होता. त्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळत आहे. शेवटी ते साक्षात भगवंताच्या घरचं जेवण. त्या जेवणाची चव वर्णन करायला शब्द कुठून आणावेत.
श्रीजी महाराजांची भेट होणं हा तर आमच्यासाठी खूप मोठा आशिर्वाद आहे. Charismatic & Magnetic Personality हे शब्द dictionary मध्ये वाचले होते पण त्याचा प्रत्यक्ष अनुभव म्हणजे श्रीजी महाराज.
मला तर वाटतं कि किती नशिबवान आहेत माणिकनगर व तिथल्या जवळपास च्या गावांमध्ये राहणारे गावकरी, तिथल्या शाळेत आणि वेद पाठशाळेत शिकणारे विद्यार्थी आणि नेहमी त्यांच्या सहवासात असणाऱ्या सर्व व्यक्ती. कारण श्रीजी म्हणजे “ज्ञानसागर”. त्यांच्याकडून किती प्रकारचं ज्ञान घेऊ असं वाटतं आणि त्यासाठी हा एक जन्म तरी पुरेसा पडणार नाही हे नक्की. सकाळी पूजा व इतर सर्व धार्मिक विधी सुरू असताना सलग ४ , ५ तास उभे राहून देखील येणाऱ्या सर्व भक्तांना भेटून, त्यांची विचारपूस करून, क्षणभरही विश्रांती न घेता पुन्हा प्रफुल्लित होऊन संध्याकाळी पुन्हा तोच उत्साह आणि पुढच्या कार्यक्रमातील त्यांचा वावर बघून थक्क व्हायला झालं. त्यांना बघितलं कि मला त्यांच्याच कवितेच्या ओळी आठवतात.
“देख न सकती आँखें जिसको, मैने उसको देखा है “…
आता परतीचा प्रवास करायचा होता पण त्या आधी आम्ही श्री सर्वेश्वर देवालय , श्री दत्त मंदिर , प्राचीन औदुंबर , हनुमान मंदिर इथे दर्शन घेतलं.
श्री मनोहर माणिक प्रभु महाराज,
श्री मार्तंड माणिक प्रभु महाराज,
श्री शंकर माणिक प्रभु महाराज,
श्री सिध्दराज माणिक प्रभु महाराज
या दिव्य विभूतींच्या समाधींचे हि दर्शन आम्ही घेतले.
मंदिर आवाराताच असणारे paintings बघून प्रभुमहाराजांचे चरित्र आपोआप डोळ्यांसमोरून पुढे पुढे सरकत जातं आणि आपण स्वतःला विसरून जातो. खुप छान वाटतं.
श्री आनंदराज प्रभु महाराज, श्री चैतन्यराज प्रभु महाराज आणि संपूर्ण टीम चा उत्साह आणि उत्सवाचे व्यवस्थापन बघून आम्ही भारावून गेलो. आपल्या घरी एखादा छोटासा जरी कार्यक्रम असेल तरी आपली तारांबळ उडते पण इथे एवढ्या मोठ्या प्रमाणावर सगळी व्यवस्था कशी बरं सांभाळत असतील हे सर्वजण? हे एक कोडंच आहे.त्यातून येणाऱ्या सर्व भक्तांचं आदरातिथ्य आणि सहकार्य हेही न चुकता करतात.आम्ही त्यासाठी खरंच सर्वांचे
अत्यंत आभार मानतो अगदी मनापासून.
माणिकनगर येथील केवळ काहीं तासांच्या वास्तव्यात देखील आम्ही खुप काहीं शिकलो.
एकीकडे श्री प्रभुमहाराजांचे दर्शन झाल्याचा अतीव आनंद तर दुसरीकडे लगेच परतावं लागणार याचं दुःख. खूपच द्विधा मन:स्थिती झाली होती.
पण आम्हाला खात्री आहे कि लवकरच परत श्री प्रभुमहाराज आम्हाला बोलवतील त्यांच्या वास्तव्याने परम पावन झालेल्या प्रभु नागरी मध्ये कारण ते त्या प्रत्येक भक्ताची हाक ऐकतात जे भक्त त्यांची मनापासून , आर्ततेने आठवण काढतात.
by Uma Herur | Nov 28, 2022 | Uncategorized
परमपूज्य सद्गुरु श्री ज्ञानराज माणिक प्रभु महाराजांनी परमार्थ मार्गातील साधकांसाठी त्याच्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांपैकी एका मोठ्या अडथळ्याचे, रामायणातल्या सुवर्णमृगाच्या प्रसंगाचे उदाहरण देऊन, त्याचे स्वरूपही सांगितले आहे आणि त्याला पार करून जाण्याचा बोधही फार मार्मिकपणे केला आहे.

स्वर्णमृग पर लुब्ध होकर देख सीता खो गई ।
मुग्ध होकर बुद्धि की सुविचार क्षमता खो गयी ।।धृ।।
है असंभव हेममृग यह राम भी थे जानते ।
जानकर भी हाथ में ले चाप-शर वे भागते ।
भंग तृष्णासंग से आनंदघनता हो गई ।
स्वर्णमृग पर लुब्ध होकर देख सीता खो गई ।।१।।
है प्रलोभन दे रहा मारीच आत्माराम को ।
ताकि रावण हर सके सुख शांति औ’ विश्राम को ।
स्वर्णमृग के मोह में मति की सुसमता खो गई ।
स्वर्णमृग पर लुब्ध होकर देख सीता खो गई ।।२।।
है विषय सब स्वर्णमृग सम सर्वदा यह जान तू ।
बुद्धि-सीता हो न मोहित, ध्यान रख यह ‘ज्ञान’ तू ।
ध्यान इतना रख समझ ले पार सरिता हो गई ।
स्वर्णमृग पर लुब्ध होकर देख सीता खो गई ।।३।।
श्रीरामांची अर्धांगिनी, सीता, ही अत्यंत पवित्र, शुद्ध चरित्राची पतीव्रता, अशी स्त्री जिचा उल्लेख ‘पंचकन्यां स्मरे नित्यमं’ मध्ये प्रथम क्रमांकाने येतो, ती सीतासुद्धा सुवर्णमृगाच्या वैषयिक दर्शनाने, त्याच्या प्राप्तीसाठी कशी वेडीपीशी होते, हा प्रसंग आहे.
‘स्वर्णमृग पर लुब्ध होकर देख सीता खो गई’ वनांत इतस्ततः मजेत विहार करणाऱ्या सुवर्णमृगाला पाहून सीता हरखून गेली. श्रीजींनी ‘लुब्ध’ हा शब्द बरोब्बर परिस्थितीला साजेसा घातलेला आहे. लुब्ध शब्दात हावरेपण आहे (Greedyness). ‘मला ते पाहिजे म्हणजे पाहिजेच’ हा भाव आहे. त्याचाच परिणाम असा झाला की ‘मुग्ध होकर बुद्धी की सुविचार क्षमता खो गई।’ सीता वेडीपिशी झाली. चांगलं काय, धोक्याचं काय, यामध्ये निर्णय घेण्याची बुद्धीची क्षमता त्यामुळे पांगळी झाली.
सद्गुरु श्री ज्ञानराज महाराजांनी अत्यंत दयाळू होऊन साधकांना अप्रत्यक्षपणे इशारा केला आहे की, जगातले बाह्य विषय संख्येने जरी पाचच (शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध) असले, तरी त्यांची आकर्षणशक्ती सीतेसारख्या भल्याभल्यांनाही मोहित करते. त्यांचीही मती भ्रष्ट करू शकते. यासाठी श्री समर्थ ही उपदेशितात,
‘मना कल्पना ते नको विषयांची ।
विकारे घडे हो जनी सर्वचीची ।’
म्हणून या प्रथम टप्प्यावरच साधकाने जागृत राहून मनाच्या संकल्पामागे न जातां, बुद्धीची निर्णय क्षमता जपली पाहिजे.
‘आली उर्मी साहे, तुका म्हणे थोडे आहे।’
याचे कारणही महाराजांनी पुढच्या ओळीत दिले आहे. ‘है असंभव हेममृग ये रामभी थे जानते।’ श्रीराम परमात्मा आहेत, सर्व शक्तिमान, सर्वज्ञ असे आहेत. त्यामुळे सुवर्णमृग असंभव आहे किंबहुना हे मायाजाल आहे, हे श्रीरामांना माहीत होतेच. तरीही ‘जानकर भी हाथमे ले चाप शर वे भागते।’ अत्यंत विचक्षण बुद्धीने महाराजांनी त्या आत्मचैतन्याच्या स्वभावाकडे निर्देश केला आहे.

मूळ आत्मचैतन्य जरी रंगहीन असले, तरी त्या स्फुरणाला मनातील वासनेचा रंग चढला, की त्या विषयाची वृत्ती होते. मन इंद्रियांना जोडलेले असल्यामुळे, वासना जर उत्कट असेल तर त्या वृत्तीची उर्मी होऊन इंद्रियांकडे धाव घेते आणि इंद्रिय ते कर्म करतात. हा सर्व प्रकार घडण्यासाठी मूळ अधिष्ठान हे आत्मचैतन्याचेच असते. ते जर नसले, तर वरील प्रक्रियाच होत नाही.
म्हणूनच महाराज म्हणतात, सुवर्णमृग असंभव आहे हे जाणूनही श्रीराम धनुष्यबाण घेऊन धावले. भगवान श्रीराम हे एकबाणी, एकवचनी आहेत, हे माहीत असल्याने, माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी ते स्वतः गेलेत म्हटल्यावर, आता इच्छापूर्ती नक्की होणार या कल्पनेनेच ‘भंग तृष्णासंग से आनंदघनता हो गई।’. सुवर्णमृग मला हवा ही उत्कट आशातृष्णा आता श्रीराम भागविणार, या जाणिवेने सीता अतिहर्षित झाली.
खरे तर विवेकाने हिताचीच गोष्ट मनात ठसते पण मन जर विकारांच्या हातचे खेळणे बनले तर मात्र ‘प्रमाणांतरे बुद्धि सांडोनि जाते.’ सीतेचे नेमके तेच झाले. ‘अव्यवस्थित चित्तानां प्रसादोऽपी भयंकरः।’ (अर्थ – ज्यांच्या मनाचे वागणे अव्यवस्थित म्हणजे जसे असायला हवे तसे नसते, ते प्रसन्न झाले तरी त्याचा परिणाम भयंकर होऊ शकतो.)
‘है प्रलोभन दे रहा मारीच आत्माराम को।’ सुवर्ण मृगाचे रूप घेतलेला मारीच मामा, तो आपल्या मागे येत असलेल्या श्रीरामाला, थोडं माना वळवून, थोडं पुढे पुढे पळून, सीतेपासून दूर दूर नेऊ पाहतो. त्याचप्रमाणे मात्रास्पर्शाने वैषयिक बनलेली बुद्धिवृत्ती आपल्या मूळ विवेकी स्वरूपापासून दूर जाते. असं झालं तर त्याचा परिणाम काय होतो, हे श्री महाराज पुढच्या ओळीत सांगत आहेत. ‘ताकि रावण हर सके सुख शांती औ’ विश्राम को।’ मनाला वाटणारी आवड निवड प्रामाणिक नसते. इंद्रिय बाह्यांगाला भूलतात. त्यामुळे विषयाचा स्विकार किंवा धिक्कार हिताच्या दृष्टीने, नेमकेपणाने करता येत नाही. अशाप्रसंगी ग्राह्य-त्याज्य सार-असार अशा द्वंद्वांमध्ये नेमका हिताचा निर्णय घेण्याची विवेकशक्ती जर बावचळली तर भवसागराच्या महाभयंकर लाटा आपल्याला कधी गिळंकृत करतील, याचा नेम नसतो. म्हणून समर्थ म्हणतात, ‘मना कल्पना ते नको विषयांची।’ पुढे समर्थ म्हणतात, ‘महाघोर संसार शत्रू जीणावा.’ श्री महाराजांनी रावणाचा जो उल्लेख केला आहे, तो या संसार शत्रूलाच उद्देशून केला आहे, असे मला वाटते. वरकरणी सुखाचा मुखवटा घातलेला संसार, हेच दुःखाचे मूळ आहे, असे अनेक संतांनी सांगितलेले आहे. संत सद्गुरु दासगणू महाराज म्हणतात, ‘भूलू नको मना संसारा ।
ना येथ सुखाचा वारा ।।
दुःखाचे मूळ संसार ।
बा करिल बहुत बेजार ।।
लोभाचे करुनि मांजर ।
तुज फिरवील दारोदार ।।
श्री महाराजांनी या संसार शत्रूला रावणाचे रूप दिले आहे, जो सुख शांती आणि विश्राम हरण करतो. याचे कारणही श्री महाराजांनी पुढील पंक्तीत कथन केले आहे, ‘स्वर्णमृग के मोह में मति की सुसमता खो गई।’
लोभ, मोह या गोष्टी मनबुद्धीला क्षोभ देण्यास कारणीभूत होतात, त्यामुळे त्यांचे स्थैर्य ढळते, समत्व बुद्धीने विचार करण्याची क्षमता उणावते. गीतेमध्येही या समत्व बुद्धीचा संदर्भ साधकाला योग साधण्याच्या दृष्टीने अनेक ठिकाणी आला आहे. जसे ‘सर्वत्र समबुद्धय:’, ‘समबुद्धिर्विशिष्यते’, ‘समं पश्यन्हि सर्वत्र’ इत्यादि.
मोहामुळे बुद्धीचा हा जो महत्त्वाचा आणि सर्वात उच्च प्रतीचा गुण आहे, तो नष्ट होतो आणि साधकाला साधनेमध्ये आडकाठी होऊ शकते. म्हणूनच श्री महाराजांनी रामायणातील सुवर्णमृगाच्या प्रसंगाच्या आधारे साधकांना सावध राहण्याचा बोध केला आहे. ‘है विषय सब स्वर्णमृग सम सर्वदा यह जान तू।’ जगातील बाह्य विषय हे त्या सुवर्णमृगाप्रमाणे भ्रांती निर्माण करतात. विवेकी बुद्धी भ्रष्ट होते. म्हणूनच समर्थ म्हणतात, ‘अति लोभ त्या क्षोभ होईल जाणा, अती विषयी सर्वदा दैन्यवाणा।’ असे होऊ नये म्हणून, श्रीमहाराज बोध करताहेत, ‘बुद्धी सीता हो न मोहित, ध्यान रख यह ‘ज्ञान’ तू।’ या काव्यात बुद्धीला सीतेचे रूपक दिले आहे, तिला झालेल्या मोहाचा परिणाम किती भयंकर झाला, हे जाणून श्री महाराज अत्यंत कृपाळूपणे साधकाला आश्वासन देत आहेत की, अशी बुद्धी जर बाह्य विषयांना मोहित होऊ दिली नाहीस म्हणजेच, तुझे हवे-नको उणावले, तर मग ही भवनदी तू पार केलीसच असे समज.
साधकाचे हवे-नको उणावले की मनाची चंचलता उणावते. बुद्धीची विवेकशक्ती सबळ होते. वृत्ती बाहेर न धावता अंतर्मुख होऊ शकतात आणि अशा अंतर्मुख वृत्तीलाच परमात्म्याच्या दर्शनाची योग्यता प्राप्त होते. परमपूज्य सद्गुरु दासगणू महाराज म्हणतात, ‘अंतर्मुख वृत्ती करी । जरी बघणे असेल हरी।’
परमपूज्य श्री सद्गुरु ज्ञानराज महाराजांच्या चरणी शरण राहून वरील विवरण केले आहे. काही चुका झाल्या असल्यास मला क्षमा करून मार्गदर्शन करावे, ही प्रार्थना चरणी करते.
by Pranil Sawe | Nov 21, 2022 | Uncategorized

आज श्रीगुरु आराधना होती. सूर्य मावळतीला झुकत होता. आरक्त वर्णाच्या त्या बिंबातून बाहेर पडणारी सौम्य किरणे भोवतालच्या आसमंताला सोन्याच्या जेजुरीसारखी पिवळीधम्मक करत होती. गायकाच्या परावाणीतून सुरांचे कारंजे थुईथुई नाचत होते. हंस: सोऽहम् सोऽहम् हंस:, अजपाजप सद्ब्रह्म प्रकासा हे भजन अगदी टीपेला पोहोचले होते. वाद्यवृंदाच्या तालसुरांची मोहिनी, एव्हाना भक्तांवर गारुड करायला लागली होती. आराधनेच्या वेळी श्रीगुरु आपल्या शिरावर मंगल कलश घेऊन भजनाच्या तालावर लयबद्ध डूलत होते. शिवासुद्धा ह्या आनंद सोहळ्यामध्ये न्हाऊन निघत होता. श्रीगुरुंवरून त्याची नजर काही केल्या हटत नव्हती. देहभान हरपून तो अनिमिष नेत्रांनी श्रीगुरुंना आपल्या डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न करत होता. त्याची नजर काहीतरी शोधत होती.
अस्त समय शिव नाचत प्यारा,
शांभवगण शिव हर ललकारा
हे वाक्य ऐकायला आणि श्रीगुरुंमध्ये त्याला साक्षात् शिवशंकर दिसायला एकच वेळ साधली गेली. अवघे दहा क्षण ही नसतील पण शिवाचा शोध आता संपला होता. समोर जे काही दिसलं तो भास नक्कीच नव्हता. डोळ्यातील आनंदाश्रूंनी त्याने मनोमन उभ्याउभ्याच श्रीगुरुंना अभिषेक घातला. ज्याच्या दर्शनाची आस आजवर लागली होती, तो क्षणात साक्षात् समोर येऊन, श्रीगुरुरुपात विलीनसुद्धा होऊन गेला होता.
दुसऱ्या दिवशी शिवाने श्रीगुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करुन, त्यांना काल संध्याकाळी घडलेला प्रकार सांगितला. त्यावर खळखळून हास्य करीत श्रीगुरु म्हणाले, अरे मीच काय, तू ही शिवस्वरूप आहेस, अनुभव घे… शिवा थोडा गोंधळला. श्रीगुरुंचे ते शब्द त्याच्या कानामध्ये रुंजी घालत होते. दुपारी शिवा बाजूच्याच एका शिवमंदिरात गेला. दुपारच्या वेळी ऊन मी म्हणत होते. अगदी पुरातन असलेल्या ह्या मंदिर परिसराला गुप्तकाशीही म्हटले जायचे. मंदिराचा परिसर मोठा प्रशस्त होता. अनेक शिवलिंगे या परिसरात स्थापिली होती. पण मुख्य मंदिर काहीसे वेगळे होते. येथे शाळुंकेवर शिवलिंगाच्या ऐवजी शाळीग्राम होता, जणू तो हरिहराचे ऐक्यच दाखवीत होता. मंदिराच्या कळसावरही रामाच्या धनुष्यबाणाचे चिन्ह होते. मुख्य मंदिरात मनोभावे दर्शन घेतल्यावर, शिवा बाहेर आला आणि अचानक आकाशात काळ्याकुट्ट ढगांची गर्दी जमली. जोराचा वारा वाहून गडगडाट व्हायला लागला. शिवा जगन्मातेचे दर्शन घेऊन तिच्या मंदिराच्या आवारात दोन मिनिटं बसला होता आणि त्याच वेळेस विजांच्या कडकडाटासहीत धुंवाधार पाऊस सुरू झाला. शिवाला परतीची घाई होती. कोसळणाऱ्या पावसातच त्याने मंदिराबाहेर एक पाय ठेवला आणि त्याचे अंग मोहरून गेले. पावसाच्या पाण्याचा स्पर्श त्याला शीतलता प्रदान करत होता. तो थंडगार स्पर्श त्याला हवाहवासा वाटू लागला. मंदिरातून परतीच्या मार्गात शिवा पुन्हा मुख्य मंदिराच्या समोर होता. एव्हाना शिवा अचानक आलेल्या पावसामुळे, नखशिखांत भिजला होता. मंदिराच्या पायऱ्या उतरताना, पाच दहा मिनिटाच्या झालेल्या पावसाच्या पाण्याने मंदिर परिसरात पाण्याचं चक्क तळ साचलं होतं. गुडघाभर साचलेल्या त्या पाण्यातून वाट काढताना, शिवा मंदिराच्या महाद्वारापाशी आला. परतीचा नमस्कार करताना त्याला श्रीगुरूंचे शब्द आठवले, अरे मीच काय, तू ही शिवस्वरूप आहेस, अनुभव घे…
श्रीगुरुंनी त्याला आज त्याच्या शिवस्वरूपाची जाणीव करून दिली होती. पुरातन शिवमंदिरात जेथे लखलखीत ऊन पडले होते, तेथे क्षणात पाऊस येतो काय आणि आपल्या देहाला भिजवून जातो काय ह्याचे गूढ शिवाला उलगडले होते. शिवशंकराला जल अत्यंत प्रिय आहे आणि शिवाच्या देहरूपी पिंडीवर अस्तित्वाने आज पावसाची संततधार धरली होती. गुप्तकाशी स्थानामध्येही साठलेल्या पाण्यामुळे शिवाला जणू गंगास्नानच घडले होते. कृतज्ञ आणि कृतार्थ भावनेने ओघळलेले डोळ्यातील आनंदाश्रू पावसाच्या साचलेल्या पाण्यात मिळाले होते. जीवाला शिवाची ओळख झाली होती, शिवाला अंत:स्थ शिवाची ओळख झाली होती. श्रीगुरुंनी शिवाला त्याच्या स्वस्वरूपाची ओळख करून दिली होती. आनंदाच्या त्या भरात शिवा झरझर परतीच्या मार्गाला लागला होता आणि त्याचवेळी त्याच्या कानाला कुठेतरी दूरवरून भजनाचे सूर ऐकू होते,
हा शैव नव्हें मनुजाधम मूढ तो ऐका,
मी सांब नव्हें कोण मी धरी जो शंका…
by Prachi Karnik | Nov 16, 2022 | Uncategorized
हेचि अमुचे आहे माहेर माहेर
श्रीप्रभुचे धाम हे श्रीमाणिकनगर।। धृ।।
ज्ञानराज प्रभु माय माऊली माऊली
विसावतो त्यां प्रेमळ कृपेच्या साऊली।। 1।।
ज्ञानराज प्रभु आम्हांसि तात तात
साम-दामाने करती सहजी निभ्रांत।। 2।।
ज्ञानराज प्रभु वडिल बंधु बंधु
रक्षिती तरताना हा भवजलसिंधु।। 3।।
ज्ञानराज प्रभु सद्भाग्ये सद्गुरु सद्गुरु
तेची लोपवितील अज्ञान अंधारु।। 4।।
ज्ञानराज प्रभु-वचनाची गोडी गोडी
लावी मानसी प्रभुनगरीची बहू ओढी।। 5।।
ज्ञानराज प्रभुसी करिता नमन नमन
क्षणभर मर्कट मन होतसे “न मन”।। 6।।
ज्ञानराज प्रभु ठेवा शिरी हस्त हस्त
द्वैतासि करुनी टाका आता प्रभु नास्त।। 7।।
ज्ञानराज प्रभु ही एक विनती विनती
जन्म-मरणाची चुकवा अमुची फिरती।। 8।।
by Rashmi Mahajan | Nov 16, 2022 | Uncategorized
श्रीसिद्धांच्या पूण्यप्रद श्रीमाणिकनगरीचे वंशज||
संत मिरेसम हरीभक्त श्रीहराचे प्रिय-आत्मज||१||
प्रतिभावंत बुद्धिवंत सखोल आभ्यासु चिकित्सक वृत्ती||
लेखन काव्य वक्तृत्वासह भाषांवर प्रभुत्वाची व्याप्ती||२||
निस्वार्थी सदाचारी आवड सामजिक सेवाभावाची||
भावनाप्रधान निष्काम चर्येवर मुद्रा बालभावाची||३||
प्रज्ञा-कला-गुणांचा मनोहर मिलाफ श्री ज्ञानराजजी||
माणिकरत्नशिरोमणी शोभे प्रभूंच्या किरीटामाजी||४||
निरुपणाने ज्यांच्या होई अज्ञानाचा सहज लय||
आचरण ठेवता तद्वत जिव बने सुबुद्ध ज्ञानमय||५||
प्रभावी भाषाशैलीने करवता बिकट-परमार्थाचा सुलभ प्रवास||
भक्तवर्ग तुमच्या सत्संगात साधतो भौतिक आत्मिक विकास||६||
खंबीर नेतृत्वाने तुमच्या मिळालं श्रीसंस्थानाला नवं रुप-चेहरा||
भक्तवत्सला नित्य अन्नदानासह सुविधायुक्त केलात यात्री निवारा||७||
तुमच्या साहित्यसेवेचा ‘सकलमत सिद्धांत’ वंदनीय||
‘माणिकरत्न’ मासिकासह स्तोत्रं-ग्रंथ-पुस्तकं सुवाचनिय||८||
किती प्रेमाने अभिमानाने भक्त तुम्हास म्हणती श्रीजी प्रभु||
गुरुस्थानी तनुस तुम्ही जन्मदिनी स्विकारावे काव्यपुष्प हे विभु||९||
by Chaitanyaraj Prabhu | Nov 9, 2022 | Uncategorized

चैत्र शुद्ध प्रतिपदा के दिन श्रीजी ने संकल्प किया, कि आश्विनमास में ब्रह्मलीन श्री सद्गुरु सिद्धराज माणिकप्रभु महाराज की आराधना जगन्नाथपुरी धाम में संपन्न की जाएगी। कहते हैं, कि संकल्प में महान् शक्ति होती है। उस संकल्प की परिपूर्ति भले ही ५-६ महीनों के बाद होने वाली थी परंतु यह संकल्प स्वयं श्रीजी का होने के कारण आयोजिन की यशस्विता उसी दिन सुनिश्चित हो गई थी। भक्तजनों को सूचित किया गया, कि वे इस यात्रा में सम्मिलित हो सकते हैं। जून तक संस्थान के कार्यालय में करीब-करीब ८०० यात्रियों के रेजिस्ट्रेशन हो चुके थे। ८०० से अधिक भक्तजनों के इतने विशाल समूह को यात्रा पर ले जाना एक अत्यंत चुनौतीपूर्ण कार्य था। तदनुसार श्रीजी के समर्थ नेतृत्व में यात्रा की तैयारियाँ आरंभ हुईं। कार्यक्रम तथा यात्रियों की व्यवस्था के संदर्भ में कईं बार कार्यकर्ताओं की बैठकें हुईं और गहन विचार-विमर्श के बाद एक सुनियोजित योजना बनाई गई और तदनुसार कार्यकर्ताओं को उनकी जिम्मेदारियाँ सौंप दी गईं। संस्थान के सभी कार्यकर्ता संपूर्ण उत्साह के साथ तैयारियों में जुट गए।
८ अक्तूबर की शाम को माणिक पौर्णिमा पर्व का आयोजन हुआ। जगन्नाथ पुरी की यात्रा में भक्तजनों का मूल उद्देश्य क्या होना चाहिए इस पर चर्चा करते हुए श्रीजी ने अत्यंत बोधप्रद प्रवचन किया। प्रवचन के अंतर्गत अनन्य शरणागति के विषय पर बात करते हुए श्रीजी, मानो इसी बात का संकेत कर रहे थे कि जब हम भगवान् जगन्नाथ की शरण में जा रहे हैं तो हमारा भाव अनन्य शरणागति का होना चाहिए क्योंकि केवल इसी भाव से भक्त का उद्धार होता है। श्रीजी के प्रवचन के पश्चात् सभी यात्रियों को प्रवास तथा कार्यक्रमों से संबंधित महत्वपूर्ण सूचनाओं से अवगत कराया गया।

९ तारीख की सुबह श्रीजी ने श्रीप्रभु की आरती संपन्न की और यहीं से जगन्नाथ पुरी की यात्रा का श्रीगणेश हुआ। ‘‘श्री माणिको जगन्नाथः सर्वतः पातु मां सदा’’ हे प्रभु आप जगन्नाथ हैं अस्तु आप ही सदा सर्वदा सर्वत्र हमारी रक्षा करें तथा हमारे योगक्षेम का वहन कर इस यात्रा को सफल करें, ऐसी प्रार्थना करते हुए भक्तजनों ने श्रीप्रभु को नमस्कार किया। हैदराबाद की ओर निकलने वाली पहली बस के सामने नारियल फोड़कर बस को रवाना किया गया। महाद्वार के प्रांगण से सभी यात्रियों ने बस से सिकंदराबाद रेल्वे स्टेशन की ओर प्रस्थान किया। मार्ग में सदाशिवपेठ के अय्यप्पा स्वामी देवालय में भोजन ग्रहण कर सब लोग स्टेशन पर पहुँचे। पूर्व तैयारियों के लिए संस्थान के कर्मचारियों की एक मंडली ट्रकों में सामान लादकर सड़क मार्ग से पुरी के लिए निकल चुकी थी।

रेल्वे स्टेशन के प्लेटफार्म पर जिधर देखो उधर केसरी रंग की टोपीयाँ पहने प्रभुभक्त ही दिखाई दे रहे थे। प्रभुभक्तों की उपस्थिति के कारण प्रायः कोलाहल से भरे हुए उस परिसर में एक विलक्षण प्रसन्नता छाई हुई थी। जहाँ एक ओर सभी यात्रीगण ट्रेन की प्रतीक्षा में आराम से बैठे हुए थे वहीं दूसरी ओर कार्यकर्ताओं की भाग-दौड़ लगातार जारी थी। स्वयं श्रीजी भी यात्रियों के बीच जाकर क्षेम-कुशल देख रहे थे। शाम के ४ बजे माणिकप्रभु महाराज की जय के जयघोष के साथ रेल्वे का प्रवास शुरू हुआ। ट्रेन की १४-१५ बोगियाँ प्रभुभक्तों से ही भरी हुई थीं। जैसे-जैसे जगन्नाथ स्वामी और भक्तजनों के बीच की दूरी कम हो रही थी वैसे-वैसे भक्तजनों का उत्साह और श्रीदर्शन की आतुरता बढ़ती जा रही थी। रेलगाड़ी की बोगियाँ भजन की धुनों से गूंज रही थी। मृदंग और तबले की ताल के साथ तेज़ रफ्तार से दौड़ रही रेलगाड़ी के पहियों की खडल-खडल की आवाज़ अत्यंत आह्लादक थी।

ए वन से एस टेन तक सभी बोगियों में छोटी-छोटी मंडलियां बनाकर भक्तजन प्रभु के नामस्मरण में रम गए थे। भजन और संगीत के माहौल में इतना लंबा रास्ता कैसे कट गया इसका किसी को भान नहीं रहा। भजन में मग्न भक्तजनों को देखकर महाराजश्री की एक रचना का स्मरण होता है, जहॉं वे कहते हैं ‘‘सद्गुरु चरणी ठेउनिया भार चालवी संसार तोची निर्भय’’ जो भक्त अपनी सांसारिक चिंताओं को गुरुचरणों में अर्पित करके भजन के रंग में दंग हो जाता है वही मृत्यु के भय से मुक्ति पाकर निर्भय बन जाता है।
रेलयात्रा के दौरान अलग-अलग स्टेशनों पर भोजन तथा उपाहार की व्यवस्था उन-उन स्थानों के भक्तजनों ने अत्यंत निष्ठा एवं आत्मीयता से की थी। रेल यात्रा के दौरान संस्थान के कार्यकर्ताओं ने यात्रियों के खान-पान की व्यवस्था इतनी अद्भुतरीति से की थी, कि उनकी जितनी तारीफ की जाए कम है। किसी-किसी स्टेशन पर तो खाने के बक्से चढ़ाने के लिए केवल १ मिनट का ही समय होता था लेकिन ऐसी परिस्थिति में भी हमारे कार्यकर्ता पलक झपकने तक पानी की बोतलों सहित ८०० यात्रियों के भोजन का सामान बोगियों में चढ़ाकर ट्रेन निकले की राह देखते थे। सभी यात्रियों को ठीक समय पर उनके-उनके स्थानों पर खाने के पार्सल वितरित करने का जो कार्य कार्यकर्ताओं ने किया उसे देखकर रेल्वे के पैंट्री वाले भी परेशान हो गए थे।

१० तारीख की शाम को खोर्धा रोड स्टेशन पर उतरकर सभी यात्री सड़क मार्ग से पुरी धाम की ओर निकले। गोधूलि की वेला में जय जगन्नाथ की जय जयकार के साथ ८०० यात्रियों ने श्रीपुरुषोत्तमक्षेत्र में प्रवेश किया। जगन्नाथस्स्वामी नयनपथगामी भवतु मे। द्वारका के प्रासाद के द्वार पर खड़े सुदामा अपने प्रिय सखा से मिलने के लिए जैसे व्याकुल हो गए थे ठीक वैसी ही अवस्था पुरी पहुँचने के बाद यात्रियों की हो गई थी। पहली बार श्रीमंदिर के उत्तुंग शिखर का दर्शन पाकर और नीलचक्र पर लहराते हुए ध्वज को देखकर हमें जिस धन्यता की अनुभूति हुई वह वर्णनातीत है। भगवान् जगन्नाथ के दर्शन के लिए भक्तजन इतने अधीर थे कि कमरों में सामान रखकर स्नानादि संपन्न होते ही श्रीमंदिर की ओर भक्तजनों की होड़ लग गई। पुरी की सड़कों पर, वहाँ की गलियों में तथा मंदिर परिसर में प्रभुभक्त ऐसे घुल मिल गए थे जैसे अनेक वर्षों से उस स्थान से परिचित हों। पुरी नगर के नीलाद्रि भक्त निवास, नीलांचल भक्त निवास, गुंडीचा भक्त निवास तथा पुरुषोत्तम भक्त निवास के वातानुकूलित कमरों में भक्तजनों के आवास की व्यवस्था की गई थी। श्रीजी के मार्गदर्शन में यात्रियों के आवास की व्यवस्था अत्यंत सुनियोजितरीति से हुई थी।

११, १२ और १३ अक्तूबर – इन तीन दिनों की अवधि में भजन, प्रवचन तथा पूजा अर्चादि धार्मिक कार्यक्रमों का आयोजन नीलाद्रि भक्त निवास के सभाभवन में किया गया था। नित्य प्रातः विप्रमंडली की उपस्थिति में श्रीजी द्वारा श्रीप्रभु पादुकाओं की महापूजा संपन्न हुई। इस महापूजा में नित्यानुष्ठान के अंगभूत मधुमतीसहित श्रीदत्तात्रेयपूजन, श्रीचक्र का कुंकमार्चन तथा चैतन्यलिंग की रुद्राभिषेकयुक्त पूजा संपन्न होने के पश्चात् भक्तजन तीर्थ प्रसाद ग्रहण करते थे।

चार धामों में से पुरी का जो धाम है, वह भोजन के लिए प्रसिद्ध है। इस धाम में प्रभु के प्रसाद की महिमा असाधारण है। कहते हैं, कि भगवान् रामेश्वर में स्नान करते हैं, द्वारका में अलंकार धारण करते हैं, पुरी में भोजन और बदरीनाथ में विश्राम करते हैं। इसलिए पुरी धाम में यात्रियों ने प्रभु का प्रसाद ग्रहण करने के बाद जिस तृप्ति और समाधान का अनुभव पाया वह अलौकिक था। प्रभुभक्तों की क्षुधा मिटाकर उन्हें आनंदित करने के लिए साक्षात् माँ अन्नपूर्णा सकल वैभव से युक्त होकर पुरी धाम में सिद्ध हुईं थीं, ऐसा हमारा अनुभव रहा। भंडारखाने का जो भव्यरूप माणिकनगर में देखने को मिलता है उसी भव्य रूप के दर्शन हम सभीको पुरी धाम में भी हुए। व्यंजनों के प्रकार अधिक होने के कारण कुछ लोगों ने तो व्यवस्थापकों से शिकायत करते हुए कहा कि इतने पदार्थ मत बनाया करो हम समझ नहीं पा रहे कि क्या खाएँ और क्या न खाएँ। भगवान् दत्तात्रेय की झोली का प्रसाद तो मूलतः अत्यंत मधुर होता ही है परंतु पुरी धाम के संयोग से उस प्रसाद में जो अनुपम मिठास घुल गयी थी वह अवर्णनीय है। भंडारखाने में कार्यरत माणिकनगर से आए सभी कर्मचारियों ने रात-दिन परिश्रम करके खान-पान की ऐसी अद्भुत व्यवस्था की थी, कि सब देखकर आश्चर्यचकित रह गए। उल्लेखनीय है, कि एक ओर जहाँ हम सब यात्री पुरी धाम में विविध कार्यक्रमों का तथा दर्शन-महाप्रसादादि का आनंद ले रहे थे वहीं हमारे कार्यकर्ता निरंतर काम में लगे रहकर कार्यक्रम को सफल बना रहे थे। यात्रियों ने भी और विशेषकर महिला यात्रियों ने अत्यंत उत्साह के साथ विविध सेवाकार्यों में योगदान देकर आयोजन की सफलता में महत्वपूर्ण भूमिका निभाई।

यात्रा के आयोजन में श्रीप्रभु संस्थान के सभी कर्मचारियों एवं स्वंसेवकों का योगदान अत्यंत श्लाघनीय रहा। यात्रा की सफलता का सबसे बड़ा श्रेय इन्हीं कर्मचारियों एवं स्वंसेवकों को जाता है। ८०० यात्रियों के इतने बड़े समूह के साथ किसी नए स्थान पर ऐसा विशाल आयोजन करना कोई सामान्य बात नहीं है। प्रभु का अनुग्रह, श्रीजी का संकल्प और कार्यकर्ताओं के अथक परिश्रम के कारण ही इस असाध्य कार्य को अकल्पनीय सफलता प्राप्त हुई। जिम्मेदारियों का वहन करते हुए लोगों को तो दिखाई हम दे रहे थे परंतु वास्तव में गोवर्धन पर्वत तो किसी और ने ही अपनी कनिष्ठिका पर उठा रखा था।

पुरी धाम के माहात्म्य का वर्णन करते हुए बताया गया है, कि काशी में गंगास्नान का और रामेश्वर में २२ कुंडों के स्नान का जो महत्त्व है, वही महत्त्व पुरी धाम में समुद्रस्नान का है। १२ तारीख की सुबह प्रभुपादुकाओं को लेकर समस्त भक्तजनों के साथ समुद्र स्नान के लिए श्रीजी समुद्र तट पर पधारे। ‘‘श्रीमाणिक जय माणिक’’ गाते हुए सभीने समुद्र में प्रवेश किया। प्रभु के चरणस्पर्श के लिए समुद्रराज अत्यंत अधीर थे। तट से आकर टकराने वाली उन प्रचंड लहरों का उमंग और उत्साह अद्भुत था। जैसे कोई भूखा शेर अपने शिकार पर झपटता है ठीक वैसे ही सागर की भीषण लहरें प्रभुभक्तों पर आक्रमण कर रही थीं। ब्रह्मवृंद द्वारा मंत्रघोष के बीच श्रीजी ने प्रभुपादुकाओं का अभिषेक विधिवत् संपूर्ण करके संकल्पपूर्वक स्नान संपन्न किया। जो लोग कहते हैं कि समुद्र अत्यंत धीर-गंभीर होता है उन्हें एक बार पुरी के महोदधि के दर्शन करने चाहिए जो भगवान् के बालरूप की भांति अत्यंत नटखट है। समुद्र के उस उन्मत्त स्वरूप के दर्शन से सभी भक्तजन अत्यंत प्रफुल्लित हुए और सभीने जी भरकर लहरों में गोते लगाए। समुद्र स्नान तो हमने कईं स्थानों पर किया होगा परंतु यहाँ पर लहरों से मार खाने में, उनमें डूबकर बाहर आने में और ज़ोर की मार खा कर उछलकर तट पर गिर जाने में हमने जिस आनंद का अनुभव पाया वह अपूर्व था। श्रीमंदिर में चाहकर भी अपने प्रिय भक्तों का प्रेमालिंगन स्वीकार न कर पाने वाले जगन्नाथप्रभु जब भक्तजनों को अपने उर से लगाकर उन्हें अपने प्रेम और वात्सल्य से अभिषिक्त करना चाहते हैं तब वे समुद्र की लहरों में प्रगट होकर उन लहरों में आप्लावित प्रिय भक्तों को आलिंगन देकर उनपर कृपा करते हैं। रेतीले तट पर रखी हुईं प्रभुपादुकाओं से टकराती हुई लहरों का मोहक दृष्य देखकर एक क्षण के लिए लगा जैसे भगवान् जगन्नाथ और श्रीप्रभु का प्रेमालिंगन हो रहा हो। इस दृष्य को देखकर प्रभु महाराज की ही एक रचना का स्मरण हुआ जहॉं वे कहते हैं ‘‘कडकडोनि माणिकदास विठ्ठलासि भेटले!’’

समुद्र स्नान के पश्चात् श्रीजी ने भगवान् जगन्नाथ के दर्शन प्राप्त कर महाप्रसाद का लाभ लिया। इन ३-४ दिनों के दौरान सभी यात्रियों ने अनेक बार श्रीजगन्नाथप्रभु के दर्शन का लाभ लिया। जगन्नाथजी ने सबको अपनी ओर इतना आकर्षित कर लिया था, कि जब भी समय मिलता, लोग मंदिर की ओर कदम बढ़ा दिया करते थे। हज़ारों की भीड़ में और उन असंख्य लोगों में हम अपनी दो आंखों में प्रभु की छवि को संजोने में कितने सफल हुए यह तो मैं नहीं जानता पर हाँ इतना अवश्य कह सकता हॅूं, कि जगन्नाथ ने अपने विशाल नेत्रों से प्रत्येक भक्त पर कृपादृष्टि डालकर सभीका उद्धार किया है, इसमें संदेह नहीं है।
यात्रा के दौरान व्यवस्थापकों को कईं बार अनेक प्रकार की समस्याओं का सामना करना पड़ा। २-३ बार तो ऐसा हुआ, कि अनेक प्रयासों के बाद भी वे समस्याएँ नहीं सुलझ पाईं। सारे प्रयत्न करने के बाद सभी तरीके अपनाकर भी जब हम असहाय हो गए तब अचानक ही अपने-आप उन समस्याओं का निराकरण हो गया। शायद प्रभु हमें यह बता रहे हों कि तुम चाहे लाख प्रयत्न कर लो पर जब तक मेरा हाथ नहीं लगता तबतक काम पूरा नहीं हो सकता। संपूर्ण यात्रा के दौरान हमें पग-पग पर इस बात का आभास हो रहा था।

आश्विन कृष्ण तृतीया बुधवार १२ अक्तूबर को श्री सद्गुरु सिद्धराज माणिकप्रभु महाराज के सांवत्सरिक श्राद्ध का विधान परंपरानुरूप संपन्न हुआ। अगले दिन १३ अक्तूबर को ब्रह्मलीन महाराजश्री की आराधना का कार्यक्रम नीलाद्रि सभागृह में अत्यंत भव्यरीति से परिपूर्ण हुआ। प्रभुभक्तों की उपस्थिति से कार्यक्रम स्थल का संपूर्ण वातावरण माणिकमय बन चुका था। लगभग १२०० किलोमीटर सुदूर उत्कल प्रांत में होने के बाद भी लग रहा था जैसे हम माणिकनगर के ही किसी सभा भवन में हों। आराधना के कार्यक्रम में अत्यंत प्रेमभरित अंतःकरण से सम्मिलित होकर उपस्थित भक्तजनों ने सद्गुरुचरणों में अपने श्रद्धासुमन अर्पित कर श्रीकृपा संपादित की।

नित्य सायं सभाभवन में भजन और प्रवचन के कार्यक्रम आयोजित हुए। श्रीआनंदराजजी ने वाद्यवृंद और सहगायकों के साथ मिलकर सुप्रसिद्ध सांप्रदायिक रचनाओं को गाकर प्रभुचरणों में भजनसेवा समर्पित की। श्रीजी ने गीता के १३वें अध्याय के ज्ञानसाधनरूप ५ श्लोकों के विशद एवं अभिरम्य विवेचन से श्रोताओं का उद्बोधन किया। जगन्नाथ के परमपावन सन्निधान में सद्गुरु की कल्याणकारी वाणी का लाभ पाने वाले वे सभी भक्तगण अत्यंत सौभाग्यशाली हैं।

माणिकनगर में प्रभु के आंगन में कोल की जो शोभा होती है वही शोभा, वही भव्यता रासप्रिय जगन्नाथ के सन्निधान में भी देखने को मिली। जिस आनंदघन सद्गुरु ने हमारे जीवन को सुख, समृद्धि और प्रसन्नता से भर दिया हो उस सच्चिदानंद की आराधना तभी हो सकती है जब हम उन आनंददायी चरणकमलों को अपने हृदय के आनंदप्रवाह से अभिषिक्त कर उस आनंद को सर्वत्र प्रसृत करें। असीम आनंद को शब्दों के माध्यम से अभिव्यक्त करना जब असंभव हो जाता है, तब वह आनंदमग्न व्यक्ति नाचने-गाने लगता है, हंसने-रोने लगता है। लोग उसे पागल कहते हैं, उस पर हंसते हैं परंतु वह भक्त जिस आनंद का अनुभव पा रहा होता है उस आनंद को केवल तभी जाना जा सकता है जब हम भी उसीकी तरह पागल बनें। ‘‘किति वर्णू मी सुख हे अहाहा। संगीत साम हा ऊ हा। धन्य धन्य बोधक गुरु हा। मिठि घालिन मी परशिवघनरूपाला। ज्ञानरूप मार्तांडाला॥’’ हमारे सद्गुरु की रचनाओं को गाने में और उन गीतों के ताल से ताल मिलाकर नाचने में जो सुख है, वह स्वर्ग और वैकुंठ के सुख से कईं गुना अधिक श्रेष्ठ है। माणिकनगर के समस्त प्रभुभक्तों ने इस अद्भुत भजनानंद क्रीड़ा से, आयोजन की शोभा कईं गुना ब़ढ़ा दी।
कार्यक्रम के अंत में श्री आनंदराज जी ने अपना मनोगत व्यक्त करते हुए अत्यंत सुंदर भाषण किया। सभी यात्रियों को श्रीजी ने महाप्रसाद देकर अनुग्रहित किया और इस प्रकार यह ऐतिहासिक एवं अविस्मरणीय यात्रा अत्यंत भव्य-दिव्यरीति से संपन्न हुई।
१४ अक्तूबर की सुबह सभी यात्रियों ने भुवनेश्वर के लिए प्रयाण किया। भुवनेश्वर के अत्यंत प्राचीन एवं ऐतिहासिक श्रीलिंगराज देवालय में जाकर श्रीजी सहित समस्त भक्त परिवार ने दर्शन एवं प्रसाद प्राप्त किया। मंदिर के प्रांगण में सद्भक्तों ने महाप्रसाद का लाभ लिया और वापसी की रेल यात्रा के लिए रेल्वे स्टेशन की ओर निकले।जगन्नाथस्वामी की परमपवित्र भूमि को अंतिम नमन करके सभी यात्रियों ने दोपहर ३ बजे भुवनेश्वर से हैदराबाद की ओर प्रस्थान किया।

तैयारियों के लिए मई के महीने में जब हम पुरी गए थे तब वहाँ के स्थानीय लोगों ने हमें बताया था, कि अक्तूबर के महीने में पुरी प्रांत में जोरदार बारिश रहती है। इस बात को ध्यान में रखकर हमने भी नियोजन के संदर्भ में कुछ पूर्व तैयारियाँ की हुईं थीं। पुरी के लिए निकलने के एक दिन पूर्व जब हमने पुरी के लोगों से वहाँ के मौसम का हाल जाना और पता चला कि वहाँ लगातार वर्षा हो रही है। सिकंदराबाद से जब हम निकले तो पूरे रास्ते में बारिश थी। सारे व्यवस्थापक बड़े चिंतित थे, कि इसी तरह बारिश होती रही तो अनेक समस्याएँ हो सकती हैं। परंतु प्रभु की कृपा से जहाँ हम उतरे वहाँ, खोर्धा स्टेशन पर बिल्कुल बारिश नहीं थी। वहाँ का वातावरण देखकर बड़ी प्रसन्नता हुई लेकिन मन में डर बना हुआ था, कि कहीं अगले ३-४ दिनों तक पुरी में बारिश न हो। जगन्नाथ का चमत्कार देखिए, कि संपूर्ण कार्यक्रम के दौरान पुरी का नभमंडल निरभ्र था और तेज़ धुप छाई हुई थी। लेकिन कार्यक्रम के समापन के बाद जब हम भुवनेश्वर से निकले तभी सारे प्रदेश में बारिश ने कहर मचा दिया। केवल देखने मात्र से चमत्कार नहीं दिखते, उन्हें अनुभव करना पड़ता है।

यात्रा के दौरान समस्त यात्रियों ने सभी नियमों तथा समय का अत्यंत अनुशानबद्धरीति से पालन किया। विनय, संयम और अनुशासन से व्यवस्थापकों के साथ अत्यंत उत्तम सहकार्य करके सभी यात्रियों ने आयोजन को अभूतपूर्व सफलता प्रदान की। भक्ति और श्रद्धा के साथ अत्यंत स्नेहपूर्वक यात्रा में सम्मिलित हुए सभी यात्रियों का हम प्रभुसंस्थान की ओर से हार्दिक अभिनंदन करते हैं।

१५ तारीख की शाम को गुलबर्गा रेलवे स्टेशन पर उतरकर यात्री हुमनाबाद पहुँचे। हुमनाबाद रेल्वे स्टेशन पर हुमनाबाद के अनेक गणमान्य नागरिकों ने पुष्पमालाओं से श्रीजी का स्वागत किया। हुमनाबाद से माणिकनगर के मार्ग में विविध स्थानों पर श्रीजी के वाहन को रोककर प्रतिष्ठित नगरवासियों ने तथा भक्तजनों ने श्रीजी का स्वागत किया। माणिकनगर वासियों ने अत्यंत भव्य स्वागत समारंभ का आयोजन किया था। हुमनाबाद स्थित महाद्वार से लेकर माणिकनगर तक नवयुवकों द्वारा जयकारों के बीच श्रीजी का आगमन हुआ। ढोल-ताशों की गड़गड़ाहट के बीच श्रीजी ने क्षेत्ररक्षक श्रीकालाग्निरुद्र हनुमान की आरती संपन्न की और प्रभुमंदिर की ओर निकले। श्रीजी के आगमन से सारे तरु पल्लव प्रफुल्लित थे। गुरुगंगा को छूकर निकलती हुई सर्द हवा के वात्सल्यमय झोंके से माणिकनगर ने श्रीजी का स्वागत किया। आरती के सुसज्जित थाल, नभमंडल में आतिशबाजी की चकाचौंध, पुष्पवृष्टि, वाद्यों की गूंज, और लोगों की भीड़ से महाद्वार के प्रांगण में उत्सव का वातावरण छाया हुआ था। महाद्वार से अंदर प्रवेश करने के बाद जैसे ही प्रभुमंदिर के शिखर के दर्शन हुए हमारी सारी थकान क्षणभर में मिट गई। नौ सीढ़ियाँ चढ़कर श्रीजी ने यात्रियों के साथ प्रभु मंदिर में प्रवेश किया। ‘‘मुक्ति भुवन सुर प्रयाग गंगा। तूचि आह्मा त्रिपदी आणि काशी।।’’ इन्हीं नौ सीढ़ियों के ऊपर स्थित जो परमपावन सन्निधान है वहीं पर हमारी काशी, मथुरा, पुरी और रामेश्वरादि सकलतीर्थ बसते हैं। हमारी प्रतीक्षा में प्रभुमहाराज अत्यंत प्रसन्नमुद्रा में विराजित थे। 800 भक्तों से भरे हुए रथ को खींचकर सभी के योगक्षेम का वहन करते हुए पुरी की यात्रा करवाकर हमें सुखरूप वापस लेकर आने वाले प्रभुमहाराज, इतने प्रचंड कार्य को पूर्ण करने के बाद भी अकर्ता की तरह अलिप्तभाव से बैठे हुए थे। जैसे उन्होंने कुछ किया ही न हो! श्रीजी ने श्रीप्रभु की आरती की और अवधूत चिंतन के जयघोष के साथ इस अद्वितीय यात्रा का समापन हुआ।
Recent Comments