नाशिक ही प्रभु श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भुमी म्हणजे ‘ रामनगरी ‘ .येथे आयोजित केलेला ‘श्री माणिक ज्ञानयज्ञ सोहळा.’ या सोहळ्याच्या निमित्ताने’ रामनगरी ही कधी माणिकनगरी झाली कळालेच नाही.
तीन दिवस चाललेला हा ‘ज्ञानयज्ञ’ नाशिककरांना अध्यात्माच्या गोदावरी मध्ये स्नान केल्याचा आनंद देवुन गेला. सद्गुरू श्री ज्ञानराज माणिकप्रभु महाराज यांनी आपल्या रसाळ वाणीने श्रीमद् भगवद्-गीते मधील गुह्य अगदी सहजपणे भक्तांपुढे मांडले व त्यांच्या अंतर्मनात उतरवले. आम्ही नाशिककर खरच भाग्यवान आहोत त्याचे कारणही तसेच आहे.
” भाग्यवान ते भक्त केवढे
स्वयेच जाती प्रभु त्याकडे “.

शनिवार, रविवार तसेच सोमवार ची पदे आनंदराज प्रभु, चैतन्यराज प्रभु , आणि त्यांचे सहकारी भजनी मंडळ यांनी ज्या चालीमध्ये सभागृहात गायली व त्याचे निरुपम महारांजांनी ज्या पध्दतीने केले तश्या स्वरुपात नाशिककरांनी कधीच अनुभवली नव्हती.
महारांचे प्रवचन ज्या पद्धतीने पुढे पुढे जात होते तो तो श्रोते अधिकाधिक उत्सुक होत होते, एकही श्रोता आपल्या आसनापासुन हलला नाही. काय ती रसाळ वाणी, अवघड विषय सहजसोपा करुन श्रोत्यांच्या मनात उतरविणे आणि तो आपल्या दैनंदिन आयुष्यात अनुभव घेत आहोत अशा दृष्टांताद्वारे पटवुन देणे हे महाराजांच्या अलौकिक योगसामर्थ्याचीच प्रचिती देते.
हा तीन दिवसीय कार्यक्रमाचा कालावधी थोडा जास्त हवा अश्या प्रतिक्रिया भरपुर भक्तांनी आमच्या पर्यंत पोहचवल्या. पुढे तसा प्रयत्न नक्कीच करु कारण बरेच नाशिककर महाराजांच्या अमृत वाणी पासुन वंचित राहीले. पाद्यपूजेचे अनुभव आमच्या पर्यंत भाविकांनी पोहोचवले की साक्षात दत्तप्रभुंचेच दर्शन झाले आहे.
भजन आणि प्रवचन झाल्यानंतर महाप्रसादाची सेवा लिलया पार पाडण्यासाठी श्री भुषण दादां काळे आणि त्यांचे सर्व सहकारी दत्तभक्त यांचे विशेष आभार.
श्री माणिक ज्ञानयज्ञ सोहळा, सर्वांगाने यशस्वी करण्यासाठी बर्याच जणांचे मोलाचे योगदान मिळाले. त्या सर्व ज्ञात व अज्ञात भक्तांचे आम्ही मनापासून ऋणी आहोत.
सगळ्यात महत्त्वाचे नाव ज्यांच्या अथक परिश्रमाने, निरंतर ध्यासाने, आणि जिथे शब्दही कमी पडतील अशा नियोजन बध्द मार्गाने कार्यक्रम पुढे पुढे गेला ते म्हणजे आमचे मोठे बंधू श्री गोपाळ गंगाधर कुलकर्णी.

[social_warfare]