कृष्णा मजकडे पाहू नको रे माझी घागर गेली फुटून॥धृ॥
डोईवर घागर हातामधे झारी माझी वेणीच गेली सुटून॥1॥
शाम हा सुंदर अति मनोहर बहर हा घ्यावा लुटून॥२॥
माणिकप्रभु म्हणे प्रीतिची राधा हरी चरणी चाले जपून॥३॥
श्री सद्गुरु श्री माणिक प्रभु महाराज यांचे पावन चरणी शरण राहून त्यांच्या या काव्याचा आध्यात्मिक अर्थ जाणून घेण्याचा मी प्रयत्न करते आहे.
नाथांच्या जशा गौळणी किंवा भारुडं आहेत की ज्यात विषय अगदी साधा, रोजच्या जीवनातला किंवा श्रीकृष्ण अणि गौळणींच्या जवळिकेचा असतो पण त्यात गूढ अर्थ भरलेला असतो जो साधकाला चिंतनाने – आत्मतत्त्वापर्यंत पोंचवितो.
वरील काव्यात असाच अर्थ भरलेला आहे असे मला वाटते. काव्यातील गौळण ‘राधा’ आहे जी मधुर भक्तीची मुकुटमणि आहे. ‘विषय तो त्यांचा झाला नारायण’ अशी तिची सर्व विषयासक्ति केवळ श्रीकृष्ण आहे. डोक्यावर भरलेली घागर घेऊन ती चाललेली आहे, ज्यामधे सर्व संचित भरलेलं आहे. हातात झारी आहे, ज्यात प्रारब्ध कर्म घेऊन ती चाललीय पण आता घागर तर फुटलीय आणि संचित सांडून संपून गेलयं. प्रारब्ध कर्माची झारी तेवडी शिल्लक राहिली आहे.
श्री प्रभूंनी वेणीचं रुपक संसारासाठी घेतलं असावं असं वाटतं. एकदा श्रीकृष्णाची ओढ लागली की मग त्या संसाराला काय महत्व? जो नीटनेटका होता तो (माझी वेणीच गेली सुटून) विस्कळीत झाला संत तुकोबा म्हणतात त्याप्रमाणें ‘सांडिला लौकिक, लाज भय चिंता। रातले अनंता चित्त माझे’ अशी अवस्था झाली. म्हणूनच राधा, ‘कृष्णा माझ्याकडे पाहू नका रे बाबा, माझ्या संसाराची ही दैना तुझ्यामुळे झालीय’ असं त्याला सांगतेय.
बाहेर अवस्था अशी झालीय पण अंतरंगाची स्थिती काय? ‘शाम सुंदर अति मनोहर, बहरहा घ्यावा लुटून’ हा श्रीकृष्ण सुंदर तर आहेच पण माझ्या मनाचंही हरण करतोय. माझं मन माझ्या ताब्यात राहत नाहीं. बहर आला की सर्व झाड कसं फुलांनी डवरून जातं राधेच्या अंत:करणाची अवस्था तशीच झालीय. न देखे, न बोले, नाइके आणिक। बैसला हा एक हरि चित्ती॥ (तुकाराम महाराज) आणि श्री प्रभूंनी ‘लुटून’ हा शब्द अगदी मर्मिकपणे वापरला आहे. लुटून नेण्यामधे हांवरेपणा आहे, किती घेतला तरी पुरेसाहोत नाही, हा भाव आहे.
राधा भक्त आहे. श्री नारदांनी भक्तीची व्याख्याच मुळी ‘सा तु अस्मिन् परम प्रेमरूपा’ अशीच केलीय. म्हणूनच श्री प्रभूंनी राधेला ‘प्रीतीची राधा’ म्हणून संबोधिले आहे. ‘कृष्ण कृष्ण कृष्ण’ ही तिची एक वृत्ती झाली आहे. तेव्हां अशामधे राधा कृष्णच बनली तर? विभक्त नव्हे तो भक्त बनली तर? माऊलीने एके ठिकाणी सांगितले आहे की त्या कोशातल्या किड्याला बाहेरून भुंगा टोचा मारीत असतो, त्याच्या भीतीने त्या किड्याला सारखा त्याचाच ध्यास लागलेला असतो. त्यामुळे एक दिवस तो किडाही त्या भूंग्यासारखाच होऊन बाहेर पडतो हीच भीती राधेला आहे जणू । म्हणूनच ती अति सावधतेने हरिचरणाजवळ जातेय न जाणो त्याच्या ध्यासानें मी कृष्णच झाले तर। मग त्या द्वैताचा आनंद भोगायचा कुणी? जसं संत तुकोबा म्हणतात, ‘जळो माझी ऐशी बुद्धी। जी घाली मज तुजमधी॥ ऐसे करी विठुबाई।, तुझे पाय, माझे डोई॥ बस्, यांतच आनंद आहे.
सगुणाचा हा द्वैतानंद गमावू नये म्हणून राधा ‘जपून’ चालते आहे. सावधगिरीने ‘जाणिवपूर्वक’ चालते आहे. अद्वैतापेक्षा सगुण भक्तीचा आनंद तिला जास्त गमतो आहे. खरे तर राधेचे ‘जाणोनि नेणते करी माझे मन’ असेच आहे. राधा ज्ञानी भक्त आहे, तरीही सगुण भक्तीच्या रसास्वादाचा आनंद अलौकीक आहे, तो तिला सोडायचा नाही.
महाराजांचे हे काव्य सगुण भक्ताला मधुरा भक्तीचा आनंद देणारं आहे आणि पारमार्थिक साधकाला ज्ञानी भक्तांच्या अवस्थेची जाणीव करून देणार आहे.
माझ्या अल्पबुद्धीने जेवढं चिंतन होईल तो प्रयत्न मी केला आहे. श्री प्रभूंच्या चरणी मी शरण आहे. माझ्या चिंतनामधे काहीं चुका असल्यास क्षमा करावी व मार्गदर्शन करावे ही श्री प्रभूंच्या चरणी प्रार्थना आहे.
[social_warfare]
मार्मिक चिंतन . आम्हा भक्तांना सुंदर बोध झाला. जय गुरू माणिक.
जय गुरु माणिक
आपण अलंकृत केलेले शब्दांकन पाहिले आणि वाचले छान आहे. कृष्ण खरोखर कुणाला समजला नाही हे जाणून च प्रभुनी ही रचना केली आणि शब्दांचा प्रवास संपला की फक्त कोणताही आकार, विकार आणि मर्यादा नसलेल्या भावना उरतात हे जेव्हा लक्षात येईल तेव्हा च कृष्ण राधा नाते समजेल हाच या पदाचा गहन अर्थ असून तिकडे लक्ष वेधलयामुळे आपणास मनापासून जय गुरू माणिक
अतिशय सुंदर विवेचन. फार फार आवडले. नवे विचार मिळाले.खूप खूप धन्यवाद
कृष्णा मजकडे पाहू नको रे माझी घागर गेली फुटून।। प्रभु महाराज द्वारा रचित इस प्रसिद्ध पद को मैंने अनेक बार सुना है और गाया भी है परंतु इस पद के अंदर जो गूढार्थ निहित है उससे मैं अनभिज्ञ था। सौ उमा हेरूर जी ने इस पद पर जो विवेचन किया है वह अत्यंत समर्पक एवं बोधप्रद है। उन्होंने इस पद के गंभीर अर्थ पर जो प्रगल्भ चिंतन और मंथन किया है वह सचमुच स्तुत्य है। ऊपर-ऊपर से भक्तिरस प्रधान लगने वाली इस रचना के अंदर वेदांत के कितने गंभीर सिद्धांत छिपे हुए हैं यह जानकर आश्चर्य हुआ। कृष्ण की दृष्टि पड़ते ही संचित की मटकी का फूटना, प्रारब्ध की झारी, संसाररूपी सुव्यवस्थित वेणी का खुलना और अंतिम पंक्ति में हरि भक्ति के मार्ग पर सम्हलकर चलने की जो बात है वह जानकर मैं मंत्रमुग्ध हुआ। अंतिम पंक्ति में ‘‘हरि चरणी चाले जपून’’ का जो अर्थ लेखिका ने लगाया है वह अत्यंत अनोखा है। हम अपनी सामान्य बुद्धि और लौकिक दृष्टि से जब प्रभु की वाणी को, उनके उपदेशों को उनकी रचनाओं को समझने का प्रयास करते हैं तो वास्तविक अर्थ से भटक जाते हैं और स्वकल्पित अवधारणाऍं बना लेते हैं। इसीलिए महाराजश्री ने कहा है ज्ञान मार्तांडा दिव्य दृष्टिने जाणा।। महापुरुषों की लीलाओं को तथा उनके कार्य को जानने और समझने के लिए दिव्य दृष्टि की आवश्यकता होती है। और मेरा मानना है, कि सौ उमा ताई को प्रभु की कृपा से वह दृष्टि प्राप्त हुई जिसके फलस्वरूप उन्होंने प्रभु महाराज द्वारा रचित इस दिव्य पद के भीतर छिपे अमृतमय रहस्य के दर्शन स्वयं किए और हमें भी करवाए। प्रभुस्वरूप के सतत अनुसंधान के फलस्वरूप लेखिका पर जो कृपा हुई है वह यहॉं इस लेख में दृग्गोचर है। मैंने जब इस लेख को पढ़ा और लेखिका द्वारा प्रतिपादित अर्थ को समझा तो मुझे ऐसा लगा जैसे सालों से छिपा हुआ कोई खज़ाना मिल गया हो। बुद्धि की खिड़कियों को खोलने वाला यह सुंदर एवं उदात्त विवेचन मन को आह्लादित करने वाला है। सभी प्रभुभक्तों से मेरा अनुरोध है, कि इस लेख को अवश्य पढ़ें और श्रीप्रभु के इस पद में छिपे अर्थ का अनुसंधान करें। हमारा संप्रदाय ज्ञानयुक्त भक्ति का मार्गदर्शन करता है। सांप्रदायिक रचनाओं को गाना, पढ़ना और उनके अर्थ का अनुसंधान करना यह प्रत्येक प्रभुभक्त का परम कर्तव्य है और यही सर्वोच्च उपासना भी है। हमारे प्रभु महाराज ने इतने प्रेम और करुणापूर्वक, इतनी सारी सुंदर-सुंदर रचनाओं का अमृतमय उपहार हमें दिया है वह हमारे ही उद्धारहित है। गुरुमहाराज से प्राप्त उस अमूल्य उपहार का यदि हम उपयोग नहीं करेंगें तो और कौन करेगा? आंख मूंदकर घंटों तक ध्यान धारणादि विविध कठिण क्रियाओं को करते रहने से बेहतर है, कि हम श्रीप्रभु के इन अमृतमय पदों पर चिंतन करें। ऐसा करने से निश्चित ही हम उस भाव से एकरूप होकर प्रभुमय हो जाऍंगे इसमें संदेह नहीं है।
🙏🙏
🙏🙏🙏
ज्यांनी साखर खाल्ली त्यालाच माहिती की गोड म्हणजे काय? किती सुंदर राधेची स्थिती तिचे मनोगत राधाच होउन व्यक्त होउ शकते यावरून नक्की की ताई प्रभुंची अपार कृपा आहे तुमच्या वर.
प्रथम ऐकताच मला हे पद अत्यंत आवडले होते व त्या बद्धल मी चैतन्य महाराजांना विचारणा केली होती .आता तर तुम्ही त्याचे रसाळ निरूपण करून, मला अत्यंत आनंद दिलाय.
जय गुरू माणिक
जय गुरु माणिक. खूपच छान. परत वाचायला पाहिजे. श्री चैतन्यराज ने बहुत अच्छी तरह से उसका वर्णन किया है. इस को दो या तीन बार पडणे से ही उसका अर्थ समझ सकते हैं. नमस्कार 🙏 प्रकाश नेरुरकर
जय गुरू माणिक,श्री प्रभूंच्या पदाचा अर्थ भावार्थ फारच अवघड,आणि माझ्या सारख्या अध्यात्म मध्ये गती नसलेल्याला,प्रत्येक शब्दाचा भावार्थ कळायला मदत झाली व पद आणि विवेचन परत परत वाचायला गोडी वाटली.अशा प्रकारे पदावर विवेचन उपलब्ध झाल्यास खरा अर्थ समजायला मदत होईल. श्री गुरू माणिक , जय गुरू. माणिक.
अत्यंत उद्बोधक विवेचन!
असा गूढ मतितार्थ समजून उमजून तो इतक्या सहज सोप्या तसेच रसाळ शब्दांतून आपण व्यक्त केला आहे, ह्यावरुन प्रभुची आत्यंतिक कृपा आपल्यावर आहे ह्यात शंकाच नाही.
तसेच ती समस्त प्रभु भक्तांवर सुद्धा निश्चितच आहे, आणि आपल्या द्वारे हा गूढार्थ आमच्या पर्यंत पोहोचला हा ह्या प्रभु कृपेचाच प्रत्यय आहे.
आपले पुन्हा एकदा साभार अभिनंदन!
जय गुरु माणिक 🙏🏻
Sri SADGURU MANIK PRABHU MAHARAJ KI JAI