श्रावण पोर्णिमा निमित्त शरणागती विषयी माणिक प्रभु संप्रदायातील सगळया पिठाधिपतीनी समृद्ध केलेल्या पद्यमालेतील विविध भाषेतील रचनांचा तसेच देव देवतांचा संदर्भ देत शरणागती विषयी फार चित्तवेधक विवेचन केले ते ऐकून आजचे सर्व सामान्य भक्तांचे जीवन डोळयासमोर आले आणि त्या अनुषंगाने एक सामान्य जनतेचा विचार येथे प्रकट करण्याचे धाडस करतो. अध्यात्मिक परंपरेतील भक्त आसक्ति आणि दैनंदिन जीवना विषयी विन्मुखता या चक्रव्यूहात सापडलेला असताना भयाने नियतीने दिलेल्या स्थितिस अनुसरून नियत कर्मापासून परामुख होवून आणि असहाय होवून शरणागती स्विकारतो अशीच भावना प्रकट होते आणि वैराग्य चे आवेशात दुबळी माणसे जिवन विन्मुख होतात ही बाब खरोखर विचार करण्या सारखी आहे त्या पेक्षा तुझ्या आजच्या जीवनात जी भूमिका आहे आणि तिला अनुसरून तुझी जी भूमिका आहे तिला न्याय देत प्रभुचे जे निर्गुण रूप आहे त्या शक्तीशी सायुज्य पावणयासाठी तळमळ आणि उत्कटता कायम ठेव कारण आपली नियत कर्मे आणि जबाबदारी पार पडल्या नंतर हीच तळमळ आपले भांडवल राहणार आहे हाच मतितार्थ प.पु. ज्ञानराज माणिक प्रभु महाराजांच्या प्रवचनातून मिळाला अशी माझी भावना झाली.

[social_warfare]