भौतिक वस्तू प्राप्त होणे म्हणजे प्रभु कृपा नव्हे. भौतिक सुख-समृद्धी जवळ नसतानाही समाधानी आसणे, म्हणजे प्रभु कृपा.

श्री सदगुरू ज्ञानराज माणिक प्रभु महाराजांनी “प्रभु ने मेरा सब कूछ छिना” या पदातून सांगितलय की ज्यां भक्तांवर प्रभूंना कृपा करावयाची असते त्यांना प्रभु काही देत नाहीत तर त्यांच्याकडूनच सर्व काही काढून घेतात. प्रभु सर्वांसोबत असं करत नाहीत. ज्याला जे हवंय ते सर्वकाही किंबहुना त्याहून ही आधिकच देतात आणि त्यांना पूर्ण संतुष्ट करतात. परंतु कधी कधी जेव्हां एखाद्या भक्तावरती अत्यंत कृपा करावयाची असते तेव्हां प्रभु काही देत नाहीत, उलट त्या भक्ता कडून सर्वकाही काढून घेतात. सर्व काही काढून घेतल्यानंतर त्या भक्ता कडे काहीच उरत नाही. सुख आणि दुःख यांना काहीच महत्त्व राहत नाही. तेव्हां त्याच्या कडे करण्या साठी काही ही राहत नाही आणि आयुष्यात कसलीही इच्छा शिल्लक राहत नाही. फक्त एकच गोष्ट शिल्लक राहते ती म्हणजे ‘‘माणिक, माणिक जय गुरु माणिक‘‘ हे नाव घेत आयुष्य जगणे.

जीवनात जगत असताना असंख्य संकटे, विविध आडचणी सर्वांनाच येत असतात. अनेक दुःखद प्रसंगांना सामोरे जावं लागतं. त्या अडचणीच्या डोंगराला सामोरे जाण्याची, त्याच्याशी झुंजण्याची जी शक्ती आपल्याला मिळते, ती शक्ती म्हणजेच प्रभु कृपा. आयुष्यात येणारे अनेक संकटे आपल्याला नकळत टळून जातात हीच प्रभु कृपा. एकवेळचे जेवणाचे वांदे असताना ही दोन वेळचे जेवण मिळणे ही ही प्रभूचीच कृपा. ‘आता सर्व संपलं’ अस वाटत असताना पुन्हा उठून विश्व निर्माण करण्याची नवी उमेद उत्पन्न होते ती उमेद म्हणजेच प्रभू कृपा.

प्रभु चरित्रातील 23वा अध्याय जर आपण पहिला तर त्यात कोमटी जातीतील एक बालिका, लहान वयातच विधवा होते, आई, वडील भाऊ बहिण सर्व नातेवाईक, सखे सोयींरीचा साथ सुटून जातो. आधारासाठी तिला कोणीच राहत नाही,आशा आर्थहीन जीवनात जेव्हां प्रभूंची भेट होते आणि प्रभु कृपा होते तेव्हां त्याच स्त्रीला देवत्व प्राप्त होते. आज आपण त्यांना व्यकंमा देवी या नावाने पुजतो, हीच आहे प्रभु कृपा.

माणसाच्या जीवनात आनेक लहान मोठ्या घटना घडत असतात कुठल्या ना कुठल्या रूपात प्रभूंची कृपा अखंडित रूपी होतच असते, परंतु त्या माणसाला प्रभूंची झालेली कृपा कळण्या साठीही भाग्यच लागते आणि ते समजण्या साठी योग्य सदगुरू मिळण्याची गरज असते. त्याशिवाय प्रभूंची झालेली कृपा ही समजत नाही.

आपल्याला परमेश्वर आणि गुरु एकाच देहात भेटणे म्हणजे भाग्यच की हो. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो आणि पूर्वजन्मीच्या पुण्याईंचे फळ असतील की मला श्री सद्गुरू ज्ञानराज माणिक प्रभु महाराजांकडून आनुग्रह प्राप्त झाला. आणि मी जेव्हांही माझ्या सदगुरूंचे दर्शन घेतो तेव्हां हे जाणवते की माझे प्रभु आणि माझे गुरु दोघेही एकच देहात वास करत आहेत.

आशीच प्रभु कृपा सर्वांना मिळो हीच प्रभुचरणी प्रार्थना करतो.

[social_warfare]