जगन्नाथ पुरी यात्रा वर्णन
१०-१०-२२ ते १४-१०-२२ पुरी यात्रा आणि ती सुद्धा साक्षात श्री ज्ञानराज माणिक प्रभू महाराजांबरोबर ही यात्रा करायला मिळणार म्हणजे हा तर दुग्ध शर्करा योग आम्हा भक्त मंडळींसाठी. म्हणून आमची ६ महिने आधी पासून तयारी सुरू झाली.
म्हणता म्हणता १० ऑक्टोबर आली आणि आम्ही एअपोर्टवर प्रस्थान केले, प्रचंड ट्रॅफिक मधून ठरवल्या प्रमाणे १०.३० वाजता पोहोचलो. दुपार १२.०५ चे फ्लाईट वेळेवर सुटले.
भुवनेश्वर विमानतळावर संस्थाननी आम्हाला नेण्यासाठी एसी बस ची छान सोय केली होती त्यात आम्ही ३१ जण होतो.
जाताना रस्त्यात लींगराज मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
७.३० वाजता आम्ही पुरुषोत्तम भक्त निवास ह्या मुक्कामी पोहोचलो.
११-१०-२२ रोजी संध्याकाळपासून महाराजांचे प्रवचन, भजन कार्यक्रम सुरू होणार होते. आम्ही सकाळी ८.३० वाजता निलाद्री भक्त निवास येथे इडली मेदू वडा न्याहरी करून ऐतिहासिक कोणार्क/सूर्य मंदीर बघण्यास निघालो. जाताना आधी बेलेश्वर मंदिरात शंकराचे व पार्वतीचे दर्शन घेतले . तिथे बेलाचे मोठे वृक्ष आहेत.
तेथून चंद्र भागा बिच वर थांबून खेळणी, शोपीसेस घेत व नारळ पाणी याचा आस्वाद घेऊन पुढे निघालो.
सूर्य मंदीर हा बराच मोठा परिसर असून बरीच माहिती गाईड ने पुरवली. २४ रथचक्र, त्यातील एक चक्र आपल्या 10/- व 20/- रुपयाच्या नोटे वर छापलेले आहे.
सूर्य देवाची मूर्ती पूर्वेला आहे त्याच्यावर सूर्योदयाला सूर्याची कोवळी किरणे प्रथम पडतात.
पश्चिम दिशेला सूर्यदेवाची घोड्यावर स्वार झालेली मूर्ती प्रस्थापित केली आहे त्यावर सूर्यास्ताची किरणे उठून दिसतात.
संध्याकाळी ६ वाजता निलाद्री भक्त निवास येथे हॉल मध्ये आनंदराज महाराजांचं भजन फारच आनंद देत होते. त्या नंतर महाराजांचे मंत्रमुग्ध करणारे प्रवचन ऐकून तृप्त झालो.
९.३० वाजता आम्ही येथेच महाप्रसादाचा आस्वाद घेऊन जगन्नाथ मंदिरात दर्शनासाठी गेलो. तेथे कार्तिक महिन्याचा पहिला दिवस व सोमवार असल्याने प्रचंड गर्दी होती. दर्शन होऊ शकले नाही. रात्री ११.३० वाजता पुरुषोत्तम भक्त निवास येथे परत आलो.
१२-१०-२२ रोजी सकाळी ७.०० वाजता स्वर्गदार समुद्रावर समुद्र स्नानासाठी निघालो. ८-०० वाजता श्री.ज्ञानराज महाराज आले. त्यांच्या सोबत सर्व जण समुद्रात स्नानासाठी गेलो. समुद्राचे पाणी स्वच्छ व सुंदर होते. तेथे प्रचंड लाटा उसळत होत्या. सगळे एकमेकांना धरत सांभाळत होते. समुद्रात पडून परत उठत होतो. thriling experience होता. केवळ महाराज बरोबर असल्यानं एवढे धाडस करत होतो. तेथून १०.१५ वाजता परत पुरुषोत्तम भक्त निवास येथे पोहचलो.
दुपारी १२ वाजता निलाद्री भक्त निवास येथे सदगुरु श्री.सिद्धराज माणिक प्रभू महाराजांचा पुण्यतिथी सोहळा पाहण्यासाठी. भजन प्रवचन झाल्यावर रात्री प्रसाद घेऊन पुन्हा जगन्नाथ मंदिरात दर्शनासाठी गेलो. तेथे गेल्यावर शेजारती होती व लगेच मंदीर बंद झाले. त्यामुळे पुन्हा दर्शन होऊ शकले नाही. दार बंद होऊन छोट्या दरवाजातून बाहेर पडताना हा अनुभव अविस्मरणीय होता.
आम्ही रात्री १२.३० वाजता पुरुषोत्तम भक्त निवास येथे परत आलो.
१३-१०-२२-सकाळी ९ वाजता निलाद्री भक्त निवास येथे न्याहरी करून बाजूलाच असलेल्या ओडिसा हॅंडलूम हाऊस येथे ओडिसा सिल्क साडी बघण्यास गेलो तेथून प्रत्येकाने साडी, ड्रेस हमखास खरेदी केले. आम्ही असतानाच मुंबई च्या सगळ्या जमावाने त्याचे दुकान व्यापून टाकले.
सकाळी ११.३० पासून निलाद्री भक्त निवास येथे सदगुरु श्री. सिद्धराज माणिक प्रभू महाराजांची आराधना सुरू झाली.
श्री.ज्ञानराज महाराजांच्या हस्ते रुद्राभिषेक व पूजा झाली. सर्व भजने फारच आनंददायी होती. प्रत्यक्ष श्री. सिद्धराज माणिक प्रभू गात आहेत असे काही वेळा वाटत होते.
संध्याकाळी ६.० वाजता आम्ही पुन्हा एकदा जगन्नाथ मंदिरात जाण्यास निघालो. ह्या वेळी प्रत्यक्ष भगवान एका माणसाच्या रूपाने आम्हाला भेटला व त्याने त्याच्या मार्गदर्शना खाली सर्वांना ६ ते ८ फुटांवरून दर्शन घडवले. आम्ही धन्य झालो व जगन्नाथ पुरी चे भगवंताचे दर्शनाने पावन झालो.
तेथून आनंदाने आम्ही परत निलाद्री भक्त निवास येथे ७.१५ वाजता आलो.
रात्री आराधना कार्यक्रम संपन्न झाल्यावर प्रसाद घेऊन ११.०० वाजता प्रसन्न चित्ते पुरुषोत्तम भक्त निवास येथे परत आलो.
१४-१०-२२
निरोपाचा दिवस उजाडला. सकाळी ७ वाजेपासून सर्व भक्त मंडळी तयार होऊन हॉटेलच्या कॉरिडॉर मध्ये जमा झाली. श्री.ज्ञानराज महाराज सुधा भक्त मंडळी बरोबर होते. ४ बसेस निघणार होत्या आम्ही महाराजांचा आशिर्वाद घेऊन आमची शेवटची बस भुवनेश्वर एअपोर्टवर निघाली. आम्ही सगळे सुखरूप तेथून निघाल्यावर महाराज निघाले.
आम्ही निघताना महाराजांनी श्री अतुलला सांगितले मुंबईला पोहचल्यावर मेसेज कर.
एअरपोर्टवर आम्ही ११ वाजता पोहचलो आणि नंतर जोरात पाऊस सुरु झाला. आमचे विमान दुपारी ३.१० चे होते त्यामुळे आम्हाला भरपूर वेळ होता. झाले पुन्हा सर्व पुरुषमंडळी साठी खरेदी (ओडिसा कुर्ता वगैरे) सुरू झाली.
विमान बरोबर ३.०५ वाजता सुटले. पोहचण्याचे टाईम ५.२५ होते. सर्व मजेत चालेले होते.४.५५ वाजता मुंबई येथे लँडिंग साठी खाली आले आणि झपकन पायलट ने विमान वर वर नेले. अनाऊस्मेंट झाली खराब हवामानामुळे अर्धा ते १ तास उशिरा उतरेल. सर्वजण एन्जॉय करत होतो.५.४० वाजता कॅप्टनने अनाऊस्मेंट केले अजून हवामान खराब असल्याने उतरण्यास परवानगी नाही. सर्व विमाने अहमदाबाद व हैदराबादला डायवर्ट केली आहेत. आपल्या कडे इंधन अर्धा तास पुरेल एवढेच आहे. माहितीनुसार वरील दोन्ही विमानतळ १ तासा पेक्ष्या जास्त अंतरा वर आहेत.
झाले सन्नाटा झाला सर्व भक्त प्रभूंचा धावा करू लागले.
आणि चमत्कार झाला ५.५५ वाजता मुंबई विमानतळावर उतरले. तेव्हा सर्वांना कळले असणार की महाराजांनी श्री. अतुलला म्हणूनच मुंबईला उतरल्यावर कळव असे का सांगितले ते.
अश्या प्रकारे आमची पुरी यात्रा सफल संपूर्ण झाली.
Recent Comments